शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

अखेर शिवसेना नरमली, नवी मुंबई विमानतळास दिबांचेच नाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:28 IST

मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्याची प्रकल्पग्रस्तांची माहिती...

नवी मुंबई/पनवेल : एकनाथ शिंदेंसह ३८ आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील सत्तासोपानाच्या लढाईत पिछाडीवर पडलेली शिवसेना अखेर नरमली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पाठिंबा दर्शविला आहे.आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कधीही स्वत:च्या नावासाठी  आग्रही नव्हते. यामुळे नवी मुंबई विमानतळाबाबत वाद असेल, तर हा विषय संपवा, अशी सूचना मी तत्कालीन  मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती, मात्र ते ऐकायला तयार नव्हते, मला विश्वासात न घेताच त्यांनी सिडकोत ठराव घेतला. सभागृहात तो घेतला नव्हता. आता लवकरच विधिमंडळाच्या सभागृहात ठराव घेऊन  दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे  प्रकल्पग्रस्तांनी  बैठकीनंतर सांगितले.नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने अनेकदा आंदोलने केली, मोर्चे काढले. गेल्या शुक्रवारीही दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोवर प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला होता. बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव  द्यावे, अशी मागणी काही वर्षांपूर्वी केली हाेती, परंतु शिंदे यांच्या बंडातील हवा काढण्यासाठी आणि नवी मुंबई,  रायगडमधील प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांनीच हा वाद सोडवून दि. बा. पाटील यांच्या नावास संमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

भाजप नेत्यांना टाळलेसर्वपक्षीय कृती समितीत सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असला, तरी मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार गणेश नाईक, आमदार  मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार  रामशेठ ठाकूर यांच्यासह एकही  भाजप नेता उपस्थित नव्हता. हे नेते स्वत:हून गेले नाहीत, की मुख्यमंत्री ठाकरे यांनी सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना टाळले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

यांची होती बैठकीला उपस्थितीबैठकीस आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघ शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर यांच्यासह संजय तरे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, काँग्रेसचे महेंद्र घरत, अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, सपाचे अनिल नाईक यांच्यासह रायगड व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना