शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नवी मुंबई विमानतळाच्या रडारला मिळाला ग्रीन सिग्नल; धाकले आयलंडवर यंत्रणा बसविण्यास केंद्राची अटी व शर्तींवर परवागनी

By नारायण जाधव | Updated: February 20, 2024 09:01 IST

कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर मार्च २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.

नारायण जाधव

नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर मार्च २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यादृष्टीने या विमानतळावर ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी अत्यावश्यक असलेली बेलापूर शहाबाज जवळील पनवेल खाडीतील धाकले आयलंडवर निरीक्षण रडार यंत्रणा बसविण्यास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही अटी व शर्तींवर परवागनी दिली आहे.

यानुसार यात बाधित होणाऱ्या खारफुटीचे नुकसान कमी करण्यासाठी रडार यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेला पुलांच्या स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये दोन खांबांचे अंतर २० मीटरवरून ३० मीटरपर्यंत वाढविण्याची सूचना केंद्राने केली आहे. तसेच विजेच्या बचतीसाठी  रडार प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोलार पॅनल बसविण्यात येणार आहेत.  

बिल्डरांसाठी धाकले आयलंडची निवड

            सिडकोनेे पूर्वी एनआरआय कॉम्प्लेक्स मागील जागेची निवड केली होती. मात्र, यामुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर बंधने होती.

            बिल्डरांच्या अंदाजे तीन हजार कोटींचे प्रकल्प अडचणीत आले होते. यामुळे त्यांच्या संघटनेने सिडकाेकडे रडारची जागा इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.

            सिडकोची १७० हेक्टर विक्रीयोग्य जमीन धोक्यात येणार होती. हे टाळण्यासाठी धाकले आयलंडची निवड केली आहे.

वाहतुकीसाठी सोयीची जागा

धाकले आयलंड हे आयलंड पनवेल खाडीने वेढलेले आहे. बेलापूरची महागाव जेट्टी आणि सीवूड टर्मिनल येथून जवळच असून, येथून सहज ये-जा करता येणार आहे. परिसरात कोणतीही मानवी वस्ती आणि विकासकामे सुरू नाहीत. रडार यंत्रणा बसविण्यासाठी ०.५३१५ हेक्टर खारफुटीसह ६० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.

प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवाशांची हाेणार ये-जा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे केली जाणार आहेत. प्राधिकरणाच्या अंदाजानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रवासी प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे.

त्यानुसार विमानांचे किमान ३ नॉटिकल मैलावर उच्च तीव्रतेच्या धावपट्टीच्या ऑपरेशनसाठी रडार यंत्रणा बसविण्याची योजना आहे. यासाठी प्राधिकरणाने विमानांच्या चोख संचालनासाठी किमान ३ ठिकाणी विमानतळ सर्वेक्षण रडार प्रणाली बसविण्यासाठी योजना आखली आहे.