शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच?

By वैभव गायकर | Updated: August 15, 2023 13:19 IST

एकनाथ शिंदे सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारने पारित केला. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे- फडणवीस सरकारनेदेखील दि. बां. च्या नावाने ठराव नव्याने पारित केला. मात्र, या घडामोडीला एक वर्षाचा कार्यकाळ लोटला तरीदेखील त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे शिंदे सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करू लागले आहेत.

नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाबाबतची माहिती भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी शासनाकडे माहिती अधिकारात मागविली होती. त्यावर उत्तर देताना राज्य माहिती अधिकारी लक्ष्मीकांत जाधव यांनी नामकरणाबाबत शासन स्तरावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

दि.बां.च्या नावासाठी प्रथमच ठाणे, रायगड आणि पालघर येथील स्थानिक एकवटून लाखोंच्या संख्येने मोर्चे, निदर्शने तसेच आंदोलने केल्यानंतर शासनास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने स्वतंत्र ठराव करावा लागला होता. 

विमानतळाला हिंदू हृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने पारित केल्यानंतर नामकरणाच्या वादाला सुरुवात झाली. या दरम्यान शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा काही काळ संघर्षदेखील झाला. मात्र, शेवटी ठाकरे सरकारनेदेखील दि.बां.च्या नावावर ठराव करून या वादावर पडदा टाकला. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटून याबाबत अंतिम निर्णय होत नसेल तर शोकांतिका असल्याचे मत सुशांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, विमानतळाच्या नावावरून याआधीही राजकारण तापलेले आहे. विमानतळाला दि.बां.चेच नाव द्यावे या भूमिकेवर येथील भूमिपुत्र ठाम असल्याचे सांगण्यात आले.

आमदार-खासदारांविषयी नाराजी

ठरावावर वर्षाचा कालावधी होऊनही अद्याप अंतिम निर्णय होत नसेल तर स्थानिक आमदार, खासदार याबाबत गप्प का ? त्यांनी याबाबत पाठपुरावा का केला नाही, असाही प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

दि.बा.च्या नावाचा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता आमचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची पुढील आठवड्यात भेट घेणार आहोत. तसेच केंद्रीय पातळीवर याबाबत केंद्रीयमंत्री कपिल पाटील पाठपुरावा करणार आहेत. - दशरथ पाटील, अध्यक्ष, दि.बा. पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती.

दि. बां.च्या ठरावाला एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती शासन देते. मग तो होणार कधी ? शासनाने कायदेशीर प्रक्रिया करून लवकरात लवकर केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवावा. केवळ आश्वासनांवर प्रकल्पग्रस्तांची बोळवण करू नये. - सुशांत पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र फाउंडेशन.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ