शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: त्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल, घर सोडण्यास पाडले भाग

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 16, 2024 18:44 IST

Navi Mumbai: समूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे.

- सूर्यकांत वाघमारे 

 नवी मुंबई  समूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या त्या दुर्दैवी महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे. त्यातूनच ती घळ गणपती मंदिरात गेली असता त्याठिकाणी तिघांची अत्याचार करून त्यांची हत्या केली. या परिस्थितीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बेलापूर येथील या महिलेच्या हत्येच्या एक आठवड्यानंतर अखेर सासरच्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती कुणाल म्हात्रे, सासू मंदा म्हात्रे व नणंद दीपमाला कडू यांच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्नापासून तिचा सासरी छळ सुरु होता. त्यातून अनेकदा त्या माहेरी देखील निघून येत होत्या. परंतु दोन्ही कुटुंबात सामंजस्यानंतर पुन्हा त्यांना सासरी पाठवलं जात होतं. तर यापूर्वी तिच्या सासरच्यांना कर्ज काढून १० लाख रुपये दिले असल्याचेही वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हंटल आहे. त्यानंतरही तिचा छळ सुरूच असताना शुक्रवारी तिला घर सोडण्यास भाग पाडले गेले. यावेळी सासरच्या त्रासाला कंटाळून मनःशांतीसाठी त्या शिळफाटा मार्गावरील घळ गणपती मंदिरात गेल्या असता त्याच ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करून तिघांनी त्यांची हत्या केली. तिच्यावर उद्भवलेला हा प्रसंग सासरच्या त्रासामुळे निर्माण झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली असता तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा तपासात हलगर्जीपणा ?हाी महिला शनिवारी सकाळी घर सोडून गेल्या असता माहेरच्या व सासरच्या व्यक्तींनी पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु तिचे मोबाईलद्वारे ठिकाण शोधण्याची कार्यतत्परता दाखवण्याऐवजी पोलिसांनी माहेरच्या व्यक्तींनाच संशयाच्या घेऱ्यात घेतले. जर पोलिसांनी वेळीच त्यांचे मोबाईल लोकेशन शोधले असते तर त्या मंदिरात आश्रयाला असल्याची माहिती मिळाली असती. यामध्ये त्यांच्यावरील वाईट प्रसंग टळून प्राण देखील वाचले असते अशी भावना त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी