शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Navi Mumbai: त्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल, घर सोडण्यास पाडले भाग

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 16, 2024 18:44 IST

Navi Mumbai: समूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे.

- सूर्यकांत वाघमारे 

 नवी मुंबई  समूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या त्या दुर्दैवी महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे. त्यातूनच ती घळ गणपती मंदिरात गेली असता त्याठिकाणी तिघांची अत्याचार करून त्यांची हत्या केली. या परिस्थितीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बेलापूर येथील या महिलेच्या हत्येच्या एक आठवड्यानंतर अखेर सासरच्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती कुणाल म्हात्रे, सासू मंदा म्हात्रे व नणंद दीपमाला कडू यांच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्नापासून तिचा सासरी छळ सुरु होता. त्यातून अनेकदा त्या माहेरी देखील निघून येत होत्या. परंतु दोन्ही कुटुंबात सामंजस्यानंतर पुन्हा त्यांना सासरी पाठवलं जात होतं. तर यापूर्वी तिच्या सासरच्यांना कर्ज काढून १० लाख रुपये दिले असल्याचेही वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हंटल आहे. त्यानंतरही तिचा छळ सुरूच असताना शुक्रवारी तिला घर सोडण्यास भाग पाडले गेले. यावेळी सासरच्या त्रासाला कंटाळून मनःशांतीसाठी त्या शिळफाटा मार्गावरील घळ गणपती मंदिरात गेल्या असता त्याच ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करून तिघांनी त्यांची हत्या केली. तिच्यावर उद्भवलेला हा प्रसंग सासरच्या त्रासामुळे निर्माण झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली असता तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा तपासात हलगर्जीपणा ?हाी महिला शनिवारी सकाळी घर सोडून गेल्या असता माहेरच्या व सासरच्या व्यक्तींनी पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु तिचे मोबाईलद्वारे ठिकाण शोधण्याची कार्यतत्परता दाखवण्याऐवजी पोलिसांनी माहेरच्या व्यक्तींनाच संशयाच्या घेऱ्यात घेतले. जर पोलिसांनी वेळीच त्यांचे मोबाईल लोकेशन शोधले असते तर त्या मंदिरात आश्रयाला असल्याची माहिती मिळाली असती. यामध्ये त्यांच्यावरील वाईट प्रसंग टळून प्राण देखील वाचले असते अशी भावना त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी