शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

विशाल अटल सेतू देशाला मिळाला, हेच आमच्या संकल्पाचे यश : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 05:31 IST

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे केलं कौतुक

नारायण जाधव/वैभव गायकर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आज देशातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला, हे आमच्या संकल्पाचे यश आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो, असे  प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या  जागेवर आयोजित जाहीर सभेत केले.

मी २४ डिसेंबर, २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटले होते की लिहून ठेवा, देश बदलेलही आणि देश पुढेही जाईल. आज या सेतूच्या शुभारंभानंतर ते तुम्हाला दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मुंबादेवी, सिद्धिविनायक यांचे स्मरण करून मी अटल सेतू देशाला अर्पण करीत आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करून अटल सेतूची उभारणी केली आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूसह कोस्टल रोड, ऑरेंट गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा, सूर्या पाणीपुरवठा योजना, दिघा रेल्वे स्थानक, खारकोपर ते उरण लोकल मार्ग आणि खार ते गोरेगाव रेल्वे मार्ग अशा ३०,५०० कोटींच्या विकास प्रकल्पांची  पायाभरणी व लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्राच्या महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ माेदी यांनी केला.

२० वर्षे सत्ता उपभोगली, कामे केली नाहीत

पूर्वी कोट्यवधींचे मेगा स्कॅम व्हायचे. विकास प्रकल्पांचे काम कूर्म गतीने चालायचे; परंतु आमच्या काळात सेला टनेल, अटल टनेल, फ्रेट कॉरिडॉर, वंदे भारत, नव भारत, अमृत भारत, विमानतळांचे काम, समृद्धीसारख्या महामार्गांचे काम वेळेत पूर्ण हाेत आहे.  औरंगाबादची ऑरिक सिटी, शेंद्रा बिडकीन हे मेगा प्रोजेक्ट त्याची उदाहरणे आहेत. येथे पूर्वीच्या सरकारने निळवंडे धरणाचे काम २० वर्षे सत्ता उपभोगली तरी पूर्ण केले नाही. आम्ही ते तत्काळ पूर्ण केले, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारांवरही टीका केली.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे कौतुक

आजचा दिवस मुंबई, महाराष्ट्रासह विकसित भारतासाठी महत्त्वाचा आहे. देशाचा विकास होणार, ही मोदींची गॅरंटी आहे. ३३ हजार कोटींच्या कामाचे लोकार्पण केले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास सुरू आहे, असे सांगून पंतप्रधानांनी तिघांचे कौतुक केले.

पायाभूत सुविधांसाठी २००४ साली पूर्वीच्या सरकारने १२ लाख कोटी खर्च केले. आता आम्ही ४४ लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत. त्यातील ८ लाख कोटी रुपये राज्यात खर्च करीत असल्याचे माेदी म्हणाले.

कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यपाल रमेश बैस, मंत्री छगन भुजबळ, अदिती तटकरे, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जपान सरकारचे राजदूत सुझुकी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार