शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विशाल अटल सेतू देशाला मिळाला, हेच आमच्या संकल्पाचे यश : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 05:31 IST

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे केलं कौतुक

नारायण जाधव/वैभव गायकर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आज देशातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला, हे आमच्या संकल्पाचे यश आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो, असे  प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या  जागेवर आयोजित जाहीर सभेत केले.

मी २४ डिसेंबर, २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटले होते की लिहून ठेवा, देश बदलेलही आणि देश पुढेही जाईल. आज या सेतूच्या शुभारंभानंतर ते तुम्हाला दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मुंबादेवी, सिद्धिविनायक यांचे स्मरण करून मी अटल सेतू देशाला अर्पण करीत आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करून अटल सेतूची उभारणी केली आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूसह कोस्टल रोड, ऑरेंट गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा, सूर्या पाणीपुरवठा योजना, दिघा रेल्वे स्थानक, खारकोपर ते उरण लोकल मार्ग आणि खार ते गोरेगाव रेल्वे मार्ग अशा ३०,५०० कोटींच्या विकास प्रकल्पांची  पायाभरणी व लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्राच्या महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ माेदी यांनी केला.

२० वर्षे सत्ता उपभोगली, कामे केली नाहीत

पूर्वी कोट्यवधींचे मेगा स्कॅम व्हायचे. विकास प्रकल्पांचे काम कूर्म गतीने चालायचे; परंतु आमच्या काळात सेला टनेल, अटल टनेल, फ्रेट कॉरिडॉर, वंदे भारत, नव भारत, अमृत भारत, विमानतळांचे काम, समृद्धीसारख्या महामार्गांचे काम वेळेत पूर्ण हाेत आहे.  औरंगाबादची ऑरिक सिटी, शेंद्रा बिडकीन हे मेगा प्रोजेक्ट त्याची उदाहरणे आहेत. येथे पूर्वीच्या सरकारने निळवंडे धरणाचे काम २० वर्षे सत्ता उपभोगली तरी पूर्ण केले नाही. आम्ही ते तत्काळ पूर्ण केले, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारांवरही टीका केली.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे कौतुक

आजचा दिवस मुंबई, महाराष्ट्रासह विकसित भारतासाठी महत्त्वाचा आहे. देशाचा विकास होणार, ही मोदींची गॅरंटी आहे. ३३ हजार कोटींच्या कामाचे लोकार्पण केले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास सुरू आहे, असे सांगून पंतप्रधानांनी तिघांचे कौतुक केले.

पायाभूत सुविधांसाठी २००४ साली पूर्वीच्या सरकारने १२ लाख कोटी खर्च केले. आता आम्ही ४४ लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत. त्यातील ८ लाख कोटी रुपये राज्यात खर्च करीत असल्याचे माेदी म्हणाले.

कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यपाल रमेश बैस, मंत्री छगन भुजबळ, अदिती तटकरे, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जपान सरकारचे राजदूत सुझुकी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार