शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2023 13:22 IST

चबुतरे किंवा नामफलक उभारण्यात महापालिकेला विसर पडला आहे. 

अनंत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्यात खारीचा वाटा असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे गाव अशी घणसोली गावची ओळख आजही कायम आहे. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या गावात आता स्वातंत्र्य सैनिक एकही हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्या रक्तरंजित आंदोलन आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून नवी मुंबई महापालिकेने २००१- २००२ साली स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचे विविध चौकांमध्ये नामफलक लावले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे यातील अनेक नामफलक गायब झाले आहेत. त्यांचे चबुतरे किंवा नामफलक उभारण्यात महापालिकेला विसर पडला आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नवी मुंबईतील घणसोली गावच्या बालवयातील सैनिकांनी ब्रिटिशांविरोधात वानर सेनेने पहिले आंदोलन सुरू केले. घणसोलीत १९  डिसेंबर १९२९ रोजी छावणीची स्थापना झाली. ब्रिटिश सरकारविरोधात ३० जानेवारी १९३० रोजी आंदोलनाला सुरुवात झाली. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन झाले. यात घणसोलीगावचे रामा दिवड्या रानकर, चाहु आंबो पाटील, शंकरबुवा शिनवार पाटील, वामन पदा पाटील, वाल्मीक महादू पाटील, नारायण मरोजी मढवी, वाळक्या उंदऱ्या पाटील, जोमा पदा पाटील, परशुराम पदा पाटील, हाल्या हिरा म्हात्रे, रघुनाथ पवार, सीताराम पवार, दाजी लक्ष्मण गायकर यांच्यासह २५  ते ३०  सत्याग्रही तरुणांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. मीठ हातात घेऊन ब्रिटिश सरकारच्या विरोधात घोषणा देत असताना पोलिसांनी लाठीमार सुरू केला. मात्र, आता स्वातंत्र्य सैनिक स्व. शंकरबुवा शिनवार पाटील यांचा अपवाद वगळता इतर स्वातंत्र्य सैनिकांचे नामफलक किंवा जे चबुतरे अस्तित्वात आहेत, त्यांची पार दुरवस्था झाली आहे. घणसोली (चिंचआळी) येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. नारायण मरोजी मढवी यांच्या नावाची पाटी त्यांच्या वारसांनी स्वखर्चाने बनवून लावलेली आहे.

घणसोलीतील सत्याग्रह छावणीला डॉ. राजेंद्र प्रसाद, साने गुरुजी, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, कमलादेवी चटोपाध्याय, जमनालाल बजाज आदी राष्ट्रीय नेत्यांनी भेटी दिल्या होत्या. स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकाच्या पाट्या गायब झाल्याने आमदार गणेश नाईक आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना घणसोली ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे माजी शिक्षण समिती उपसभापती मोहन म्हात्रे यांनी दिली.

बेछूट लाठीमार

- पहिला सत्याग्रह १४ जानेवारी १९३०, दुसरा १३ एप्रिल १९३० रोजी सानपाडा येथील सोनखाडीतून मीठ झाला. यात सत्याग्रही ठाण्याच्या दिशेने जात असताना बोनकोडे येथे पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात गोठीवली गावचे कान्हा म्हात्रे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने कायमचे अपंगत्व आले. तिसरा ८ मे १९३० आणि १ जानेवारी १९३१ रोजी झालेल्या विलेपार्ले आणि घाटकोपरच्या परिषदेत स्वयंसेवकाची भूमिका बजावताना घणसोली गावच्या अनेक सत्याग्रहींना तुरुंगात डांबले.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई