शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

बेलापूरमधून नाईकांचा मार्ग खडतर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:04 IST

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे राजन विचारे यांना जवळपास ८० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

- कमलाकर कांबळेराष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे राजन विचारे यांना जवळपास ८० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. विशेषत: माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातून विचारे यांना ४० हजारांची आघाडी मिळाली आहे. मतांची ही आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धडकी भरविणारी आहे. विशेषत: विचारे यांचे मताधिक्य राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांना धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. बेलापूर मतदारसंघातून विचारे यांनी तब्बल ३५ हजार मतांची आघाडी घेतली होती. या वेळी त्यांना ४० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मागील पाच वर्षांत बेलापूरमध्ये युतीची ताकद वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत बेलापूर विधानसभा क्षेत्रातून गणेश नाईक यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव झाला होता. ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी आपली सत्ता राखली; परंतु विधानसभेतील पराभव त्यांच्या जिव्हारीचा लागला. त्यामुळे मागील साडे चार वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनातून फारकत घेतल्याचे दिसून आले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी दुर्मीळ झाल्याने जनसामान्यांवरील त्यांची पकड सैल झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबोला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याचा प्रभाव सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतही जाणवणार आहे. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरतील यात काही वाद नाही.मागील पाच वर्षांत गणेश नाईकच नव्हे, तर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक, आमदार संदीप नाईक तसेच महापौर राहिलेले त्यांचे पुतणे सागर नाईक हेसुद्धा मागील पाच वर्षांत जनतेत फारसे रमताना दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारांची संभ्रमावस्था झाली आहे. याचाच फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना बसला. संजीव नाईक किंवा स्वत: निवडणूक न लढता गणेश नाईक यांनी आनंद परांजपे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले. उमेदवार आनंद परांजपे असले तरी निवडणूक मीच लढवित आहे, असे सांगत त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला; परंतु प्रचाराची अपेक्षित उंची गाठता आली नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधी सूर आवळणारी काँग्रेससुद्धा या वेळी नाईकांच्या हाकेला धावून आली; परंतु मतदारांवर त्याचाही फारसा प्रभाव पडला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबाबत यापेक्षा वेगळी परिस्थिती नसणार आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासकामांचा अजेंडा त्यांच्या निवडणूक प्रचारात होता; परंतु मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे शहरातील विकासकामांनाही खीळ बसली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची, हा मोठा प्रश्न नाईक यांना सतावणार आहे. आमदार झाल्यानंतर मंदा म्हात्रे या विविध पद्धतीने बेलापूर विधानसभा क्षेत्रात आपला प्रभाव वाढविण्यात यशस्वी झाल्या आहेत. शिवाय शिवसेनेचीही ताकद वाढल्याचे लोकसभा निवडणुकीतील मतदानांवरून स्पष्ट झाले आहे.>२0१४ च्या निवडणुकीतीलमतांचा घोषवारालोकसभेच्या मागील निवडणुकीत राजन विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून ९०,९८६ मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना ६५,२०२ मतांवर समाधान मानावे लागले होते. या मतदारसंघातून विचारे यांनी २५,७८४ मतांची आघाडी घेतली होती.>मागील विधानसभा निवडणुकीचा आढावाविधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली होती. बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे ५५,३१६ तर शिवसेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ इतकी मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांना ५३,८१६ इतकी मते मिळाली होती. या वेळी लोकसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार राजन विचारे यांना मिळालेली मतांची आघाडी यामुळे या वेळेची विधानसभा निवडणूक नाईक यांना सोपी नाही, असाच राजकीय अंदाज आहे.