शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नगरपंचायतीतील कर्मचारी सुविधांपासून वंचित

By admin | Updated: March 16, 2017 03:14 IST

रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा व पोलादपूर या चार ग्रामपंचायतींचे २६ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले आहे.

गिरीश गोरेगावकर, माणगावरायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा व पोलादपूर या चार ग्रामपंचायतींचे २६ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यास सुमारे १६ महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. या निर्णयामुळे तालुक्याच्या विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या असल्या तरी अद्याप कर्मचाऱ्यांना आकृतीबंधाप्रमाणे सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यांना एवढी वर्षे काम करूनदेखील ग्रामपंचायतीच्या नियमानुसारच सुविधा मिळणार असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.तालुका मुख्यालयाची मांडणी सुनियोजित होण्यासाठी नगररचना योजना लागू करण्यात आली आहे. ज्या नगरपंचायतीची मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीची टक्केवारी कमीत कमी ९० टक्के असेल अशाच नगरपंचायतींना वेतन व नियमित निवृत्ती वेतनासाठी १०० टक्के सहाय्यक अनुदान मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १०,००० ते २५,००० लोकसंख्या असलेल्या ५६ नगरपंचायतींकरिता प्रत्येकी २९ पदांचा आकृतीबंध याप्रमाणे एकूण १६२४ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे व त्याचप्रमाणे पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.नगरपंचायतीची अधिसूचना निर्गमित करण्याच्या दिनांकापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नियमित स्वरूपात कार्यरत असणाऱ्या व नगरपंचायतीत समावेश करण्यासाठी अर्हतापात्र कर्मचाऱ्यांची व अतिरिक्त ठरलेल्या अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांच्या समावेशनाने पदे भरण्यात यावीत असे म्हटले आहे. सरकारच्या लेखी सूचना असूनसुध्दा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या सदस्य, सचिव, उपसंचालकांनी दुर्लक्ष केले आहे. नगरपंचायतीत रूपांतर झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचे प्रशासन विभाग, पाणीपुरवठा विभाग व आरोग्य विभागामध्ये किमान ३५ ते ४० वर्षे काम करणारे कर्मचारी आहेत. नगरपंचायत झाल्यानंतर आपल्याला कायमस्वरूपी सामावून घेतील अशी, आशा सर्व कामगारांची होती.