शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक, राज्याबाहेर पळून जात असताना पकडले 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 5, 2024 17:29 IST

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे.

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती पश्चिम बंगाल येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी त्याच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दारावे गावात शनिवारी रात्री महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. परिसरात राहणाऱ्या लालबानू सरदार (४५) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. मुलगा घराबाहेर गेला असता त्या घरात एकट्याच होत्या. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी लालबानू यांच्या डोक्यात जड वस्तूने घाव घालून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिवाय घटनास्थळी रक्ताने भरलेले फरशीचे तुकडे, चाकू देखील मिळून आले. 

यावरून मृत महिलेच्या मुलाकडे चाकुशी केली असता मुलाचे वडील उस्मान सरदार (६०) याच्याकडून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता असे समोर आले. तर घटनास्थळी मिळून आलेला रक्ताने भरलेला शर्ट देखील त्यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मारेकरूला शोधण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी पथक केले होते. त्यांनी तातडीने तपासावर जोर देऊन पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या उस्मान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पती पत्नीमध्ये भांडण झाले असता डोक्यात फरशी मारून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. यानुसार रविवारी सकाळी त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू