शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाम बीचवरील सेवा रस्त्याच्या बांधकामामुळे महापालिका अडचणीत

By नारायण जाधव | Updated: April 12, 2024 16:59 IST

शुक्रवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी महापालिकेच्या वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्यानुसार महापालिकेला २४ एप्रिल २०२४ ची मुदत दिली आहे.

नवी मुंबई : नेरूळ येथे पाच मार्गावर अमर बिल्डिंग ते टी. एस. चाणक्य असा सीआरझेड आणि खारफुटी क्षेत्रात सेवा रस्ता बांधण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय प्रशासनाच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. पर्यावरण विभागाच्या आदेशानुसार सीआरझेड आणि खारफुटी क्षेत्रात कोणतेही काम करायचे झाल्यास उच्च न्यायालयाची परवानगी हवी. मात्र, महापालिकेने अशी कोणतीही परवानगी नसताना या रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी महापालिकेच्या वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्यानुसार महापालिकेला २४ एप्रिल २०२४ ची मुदत दिली आहे.

महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने या रस्त्याच्या बांधकामासाठी उच्च न्यायालयाची कोणतीही परवानगी न घेता त्याचे काम सुरू केले होते. यामुळे नवी मुंबई कांदळवन कक्षाचे अधिकारी एस. एल. मांजरे यांनीही १५ मे २०२३ रोजी या रस्त्याचे काम तत्काळ थांबविण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाची परवानगी घेऊनच ते करावे, असेही प्रशासनास सूचित केले होते.

दीपक सहगल यांनी घेतली न्यायालयात धाव

याविराेधात पर्यावरणप्रेमी नागरिक दीपक सहगल यांनी जुलै २०२३ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात झाली. मात्र, १० महिने उलटूनही महापालिकेने आपले म्हणणे सादर न केल्याने न्यायालयाने महापालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी वक्त केली. यावेळी महापालिकेच्या वकिलांनी उत्तर सादर करण्याची आणखी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने येत्या २४ एप्रिल २०२४ पर्यंत तुमचे उत्तर सादर करा, असे महापालिकेला बजावले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका