शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पालिका शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 02:08 IST

पालकांमध्ये संभ्रम : लवकर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी हातभार लागावा यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या वर्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातून सुमारे २८ हजार अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. आचारसंहितेमुळे शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेला विलंब झाला असून नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू झाल्या तरी शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले, मागासवर्गीय घटकातील मुले, विधवा, घटस्फोटित महिलांची मुले, दगडखाण बांधकाम करणाऱ्या कामगारांची मुले या सर्व घटकातील पहिली ते पदवी आणि त्यानंतर तांत्रिक /व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात. शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचा विकास आणि कुटुंबाची उन्नती खुंटते. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि गुणवत्ता वाढीस मदत व्हावी या अनुषंगाने महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्यावर्षी १४ हजार ५00 अर्ज दाखल झाले होते, त्या वेळी ९ कोटी ८७ लाख रु पयांचे वाटप करण्यात आले होते. यंदा २८ हजार अर्ज दाखल झाले असून १७ कोटी ९0 लाख रु पयांचे वाटप महापालिकेला करावे लागणार आहे.

महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर शिष्यवृत्तीचे वाटप केले जाणार असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या काही महिन्यांपासून महासभा झालेली नाही त्यामुळे शिष्यवृत्ती वाटप प्रक्रियेला विलंब झाला आहे; परंतु नवीन शैक्षणिक वर्षाचे वर्ग देखील सुरू झाले तरी शिष्यवृत्तीचे वाटप न झाल्याने पालकांमध्ये संभ्रम पसरलेला असून संबंधित विभागाकडे पालक याबाबत चौकशी करीत आहेत. महापालिका प्रशासनाने शिष्यवृत्तीची रक्कम लवकर जमा करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नेरुळ पश्चिमचे भाजप सरचिटणीस अर्जुन चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.येत्या महासभेत शिष्यवृत्तीचा प्रस्ताव चर्चेसाठी येईल, त्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेनंतर शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल.- अमोल यादव, उपायुक्त समाज विकास विभाग 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNavi Mumbaiनवी मुंबईScholarshipशिष्यवृत्ती