शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पालिका रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा बंद

By admin | Updated: November 18, 2016 04:15 IST

अग्निशमन यंत्रणा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देवून महापालिकेने नेरूळमधील

नामदेव मोरे / नवी मुंबई अग्निशमन यंत्रणा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देवून महापालिकेने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाची नोंदणी रद्द करून गुन्हा दाखल केला. पण प्रत्यक्षात महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयामधील अग्निशमन यंत्रणा बंद आहे. पालिकेचे ३०० व फोर्टीजचे १५० बेडचे रूग्णालय असूनही स्वतंत्र मलनि:सारण केंद्र नाही. यामुळे आता मनपा रूग्णालयाचीही नोंदणी रद्द करायची का, असा प्रश्न शहरवासी विचारू लागले आहेत. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाची नोंदणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रद्द करून गुन्हा दाखल केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर रूग्णालयांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयामध्येही नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. अनेक वर्षांपासून येथील अग्निशमन यंत्रणा बंद आहे. अग्निशमन दलाने वारंवार सूचना देवूनही दुरूस्तीचे काम सुरू केलेले नाही. आग लागल्यास तत्काळ विझविण्यासाठी काहीही उपाययोजना नाही. रूग्णालयामधील लिफ्टही वारंवार नादुरूस्त असते. अशा स्थितीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास रूग्णांनी बाहेर कसे निघायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने डी. वाय. पाटील रुग्णालयाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. एक हजार बेडचे रूग्णालय असल्याने त्यांच्याकडे स्वतंत्र एचटीपी प्लँट असणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. महापालिकेचे ३०० बेडचे रूग्णालय आहे, याशिवाय शेजारी फोर्टीज रूग्णालय १५० बेडचे आहे. एकूण ४५० बेडच्या या रूग्णालयांनाही स्वतंत्र एचटीपी केंद्र नसताना फक्त डी. वाय. वर कारवाई का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महानगरपालिका स्वत: नियम पायदळी तुडवत असून दुसऱ्यांवर मात्र क्षुल्लक कारणास्तव कारवाई करत आहे. शहरातील ८० टक्के रूग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीमध्ये नाही. स्वतंत्र एचटीपीची सोय नाही. पालिकेने डी. वाय. पाटीलवर केलेली कारवाई आकसाने केल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित रूग्णालयामध्ये रूग्णांनी जावू नये, असे आवाहन केले आहे. यामुळे रूग्णांचाही गोंधळ उडू लागला आहे. शहरात मोफत उपचार करणारे डी. वाय. हे एकमेव रूग्णालय आहे. तेच बंद झाले तर जायचे कुठे, असा प्रश्न रूग्णांनी विचारला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या कारवाईवर टीका केली आहे. रूग्णालयाकडून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, पण अशाप्रकारे गुन्हे दाखल करून व त्याविषयी प्रसिद्धी करून बदनामी करू नये अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, या प्रश्नाचे पडसाद यापुढील पालिकेच्या सभांमध्येही उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.