शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी २६३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. माथाडीनेते शशिकांत शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल झाला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. दाखल केलेल्या अर्जांची गुरुवारी बाजार समितीमध्ये छाननी केली जाणार आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे. शेवटच्या दिवशी जवळपास ८२ जणांनी अर्ज दाखल केला आहे. ४३४ जणांनी अर्ज विकत घेतले होते. त्यापैकी तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्याच्या सहाही महसूल विभागामधून शेतकरी प्रतिनिधी अर्ज भरण्यासाठी चार दिवसांपासून मुंबईमध्ये येत होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बाजार समितीच्या चौथ्या मजल्यावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघनिहाय अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले होते.बाजार समिती निवडणुकीमध्ये कामगार प्रतिनिधीसाठी माथाडीनेते शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात कोण अर्ज भरणार याविषयी उत्सुकता प्रत्येकात निर्माण झाली होती. माथाडी संघटना एकच उमेदवार देणार की कामगारांमध्ये फूट पडून दुसरा उमेदवारही उभा राहणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या दिवसापर्यंत कोणीच अर्ज भरला नसल्यामुळे शशिकांत शिंदे यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.छाननीसाठी विशेष व्यवस्थाबाजारसमिती निवडणुकीसाठी सादर केलेल्या अर्जांची गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी सुरू केली जाणार आहे. छाननीसाठी सर्व उमेदवार व सूचकांनाही उपस्थित राहवे लागणार आहे. जवळपास ५५० नागरिक छाननीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समिती मुख्यालयाच्या समोर तंबू टाकण्यात आला आहे. चौथ्या मजल्यावर छाननीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई