शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी २६३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. माथाडीनेते शशिकांत शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल झाला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. दाखल केलेल्या अर्जांची गुरुवारी बाजार समितीमध्ये छाननी केली जाणार आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे. शेवटच्या दिवशी जवळपास ८२ जणांनी अर्ज दाखल केला आहे. ४३४ जणांनी अर्ज विकत घेतले होते. त्यापैकी तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्याच्या सहाही महसूल विभागामधून शेतकरी प्रतिनिधी अर्ज भरण्यासाठी चार दिवसांपासून मुंबईमध्ये येत होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बाजार समितीच्या चौथ्या मजल्यावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघनिहाय अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले होते.बाजार समिती निवडणुकीमध्ये कामगार प्रतिनिधीसाठी माथाडीनेते शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात कोण अर्ज भरणार याविषयी उत्सुकता प्रत्येकात निर्माण झाली होती. माथाडी संघटना एकच उमेदवार देणार की कामगारांमध्ये फूट पडून दुसरा उमेदवारही उभा राहणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या दिवसापर्यंत कोणीच अर्ज भरला नसल्यामुळे शशिकांत शिंदे यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.छाननीसाठी विशेष व्यवस्थाबाजारसमिती निवडणुकीसाठी सादर केलेल्या अर्जांची गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी सुरू केली जाणार आहे. छाननीसाठी सर्व उमेदवार व सूचकांनाही उपस्थित राहवे लागणार आहे. जवळपास ५५० नागरिक छाननीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समिती मुख्यालयाच्या समोर तंबू टाकण्यात आला आहे. चौथ्या मजल्यावर छाननीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई