शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबईतून देशाला होतो ३४ टक्के अर्थपुरवठा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:34 IST

मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, राणे यांनी व्यक्त केले मत.

नवी मुंबई : गेल्या ७५ वर्षात मराठी उद्योजकांची आर्थिकदृष्ट्या किती प्रगती झाली, हा आता संशोधनाचा विषय आहे. मुंबई ही संपूर्ण देशाचा ३४ टक्के आर्थिक भार घेते. त्यामुळे मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशी येथे मराठी उद्योजक दिनी केले.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्यावतीने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवार, १२ जुलै रोजी सायंकाळी मराठी उद्योजकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.

यावेळी मराठी उद्योजकांना मार्गदर्शनपर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांची चित्रफित दाखविण्यात आली. एव्हिट्रिक मोटर्स प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक मनोज पाटील, माने ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या संग्राम पाटील, डॉ.राजाराम पाटील आणि सुधीर राणे या मराठी उद्योजकांचा नारायण राणे यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपा