शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

भिवंडीत रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:27 IST

नागरिकांमध्ये संताप; वाहनचालकांची होतेय कसरत

भिवंडी : भिवंडी शहर परिसरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी खोदकाम केले आहे, तर काही ठिकाणी भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्त्यांवर अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत होत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भिवंडीतील शांतीनगर येथील अमजदिया स्कूल ते नवी वस्ती या रस्त्यावर गणेश सोसायटी येथे खोदकाम केले आहे. त्यातच, दोन ते तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याने या रस्त्यावर अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर सुमारे अर्ध्या फुटापर्यंत चिखल साचला आहे. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहनचालकांची दुरवस्था झाली आहे. तर, महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरच साचलेल्या पाण्याच्या बाजूला चिखल साचला आहे. मात्र, याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

भिवंडीतील अंजूरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरही सध्या चिखल पसरला आहे. भिवंडी-ठाणे महामार्गावर अंजूरफाटा ते पूर्णा परिसरातील रस्त्यांवरही चिखल साचल्यामुळे नागरिकांसह प्रवासी व वाहनचालकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे हे दोन्ही रस्ते बीओटी तत्त्वावर असूनही या महामार्गाची दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपलेत काय, असा सवाल नागरिक करत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी