शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये शांततेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:44 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध : निषेध फलक झळकावून घोषणाबाजी

कळंबोली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मंजूर करून पास करण्यात आला. परंतु कायद्याविरोधाचे देशभरातील वातावरण तापले आहे. शुक्रवारी पनवेल शहरातील मुस्लीम समाजाने कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले. या वेळी पाच हजारांपेक्षा जास्त मुस्लीम बांधव उपस्थित होते.

तळोजात या कायद्याविरोधात दोन दिवसांपूर्वी मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारी पनवेल शहरातील पटेल, कच्छी मोहल्ला, मुस्लीम नाका, भारतनगर येथील मुस्लिमांनी आंदोलन केले. त्यांनी महापालिकेच्या मैदानावर केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेगवेगळे फलक झळकावून कायद्याला विरोध केला.

कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पनवेल शहर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मुस्लीम बांधवांचा मोर्चा पनवेल महापालिकेजवळ थांबला. त्यामुळे तो तहसील कार्यालयापर्यंत जाऊ शकला नाही. शिष्टमंडळाने जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.

केंद्र शासनाने नागरिकत्वाची जी दुरुस्ती केली आहे ती भारतीयांवर अन्यायकारक आहे. याबाबत अगोदर जनजागृती करणे गरजेचे होते. तसे न करता बहुमताच्या जोरावर हा कायदा पास करण्यात आला; याबाबत लोकांना कोणतीही माहिती नाही. तसेच त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आम्ही आंदोलन केले.बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणेपनवेल : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीजवळ बहुजन क्रांती मोर्चातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. शहरातील शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करून बहुजन क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी कॅब आणि एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. हा कायदा म्हणजे संविधानाचे उल्लंघन असल्याचे या वेळी सांगण्यात आले. - लतीफ शेख, अध्यक्ष, पनवेल शहर काँग्रेसआंदोलनांच्या पार्श्वभूमीवरपोलीस यंत्रणा सज्जनवी मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना नवी मुंबईतदेखील कायद्याच्या समर्थनार्थ तसेच विरोधात रॅली होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यंत्रणा सज्ज केली असून आंदोलकांना शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने होत असून त्यास हिंसक वळण लागत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात १५ हून अधिक राज्यांत अल्पसंख्याक समुदाय रस्त्यावर उतरत आहे. त्यानुसार नवी मुंबईतदेखील शनिवारी नेरूळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.