शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाडसत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 00:11 IST

वर्षभरात ५९४ किलो गांजा जप्त; पनवेलमधून १४ आरोपी केले गजाआड

नवी मुंबई : गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल परिसरामधील अड्ड्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. वर्षभरामध्ये तब्बल ५९४ किलो गांजा जप्त केला असून, २ किलो २४५ ग्रॅम वजनाचे चरसही हस्तगत केले आहे. आतापर्यंत १४ आरोपींवर गुन्हे दाखल केले असल्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे.नवी मुंबई, पनवेल, उरण परिसर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी २०१६ मध्ये पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तेव्हापासून गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने धाडसत्र सुरू करून तीन वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त अमली पदार्थ विक्रेत्यांना तुरुंगात पाठविले आहे. नवी मुंबई परिसरामध्ये सर्वाधिक कारवाई झाली होती. एपीएमसी, तुर्भे, नेरूळ, सीबीडी व इतर ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असलेले अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. गांजासह, कोकेन, चरस, एमडी पावडर व इतर अमली पदार्थही हस्तगत केले होते. परिमंडळ एकमध्ये कारवाईचा धडाका सुरू केल्यामुळे अनेकांनी अवैध व्यवसाय पनवेल परिसरामध्ये सुरू केला होता.रिमंडळ दोनमध्ये अनेक ठिकाणी खुलेआम गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या होत्या. दक्षिणेकडून राज्यांमधून व राज्याच्या इतर भागातून रायगड व इतर ठिकाणी गांजासह इतर अमली पदार्थ विक्रीसाठी येऊ लागले होते. यामुळे २०१८ च्या सुरुवातीपासूनच पनवेल परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मार्च महिन्यात सलग दोन दिवस धडक मोहीम राबवून ४७७ किलो गांजा हस्तगत केला होता.खारघरमध्ये २५ डिसेंबरला महानगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली असताना गांजा आढळून आला होता. यानंतर पनवेल परिसरामधील अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती. यानंतर गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन महिन्यांमध्ये पनवेल परिसरामध्ये लक्ष केंद्रित केले आहे. कारवाईचा धडाका सुरू केला आहे. २२ जानेवारीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शेडूंग फाट्यावर कारवाई करून तब्बल १०८ किलो वजनाचा गांजा व २ किलो २४५ ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. तब्बल ४७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे. कारवाईमुळे अवैध व्यवसायांना आळा बसला आहे.१०० किलो गांजामध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने २३ मार्च रोजी पनवेल - मुंब्रा महामार्गावर धाड टाकून एमएच ०२ जेपी ९४३० कारमधून तब्बल १०० किलो गांजा हस्तगत केला होता. अमीर अहमद, सिराज चौधरी व मोहम्मद सिद्धिकी या तिघांना अटक केली होती. त्यांनी आंध्रप्रदेशमधून गांजाविक्रीसाठी पनवेलमध्ये आणला होता.महामार्गावर कारवाईअमली पदार्थ विरोधी पथकाने २२ मार्चला मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून सोलापूर परिसरातून रायगडमध्ये गांजा घेऊन जाणारा टेम्पो व कार ताब्यात घेतली. पोलिसांनी महेश व्हटकर व संताजी खरात यांना अटक करून ५६ लाख रुपये किमतीचा तब्बल ३७७ किलो गांजा हस्तगत केला होता.पनवेल ग्रामीणमध्ये धाडगुन्हे शाखेच्या पथकाने ३० नोव्हेंबरला पनवेल परिसरातील भल्याची वाडी परिसरामध्ये धाड टाकून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. तेथे एका महिलेला अटक केली असून ४०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNavi Mumbaiनवी मुंबई