शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा, नवी मुंबईत तब्बल साडेचार लाख वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 07:28 IST

वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे.

-सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे.२१ व्या शतकातले शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईला वाहतूककोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. त्यावर वेळीच तोडगा न काढल्यास दिल्लीपेक्षा वाईट परिस्थिती नवी मुंबईतल्या रस्त्यांवर उद्भवू शकते. सद्यस्थितीला नवी मुंबई आरटीओकडील आजपर्यंतच्या वाहनांच्या नोंदणीचा आकडा ४ लाख ६० हजारांच्या घरात पोचला आहे. त्यामध्ये डिसेंबर २०१७ पर्यंतच्या नोंदीत २ लाख २३ हजार ६७२ दुचाकी, १ लाख ३५ हजार १९७ कार, १६ हजार ९५० रिक्षा व १४ हजार ४८१ मीटर टॅक्सींचा समावेश आहे. त्यापैकी २२,०३४ दुचाकी व १०,३२२ कारची नोंदणी गतवर्षी झालेली आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे रस्त्यावर जागोजागी वाहतूककोंडी वाढत चालली आहे.राज्याची आर्थिक राजधानी मुंबईतल्या वाढत्या घरांच्या किमतीमुळे वास्तव्यासाठी नवी मुंबईचा पर्याय निवडला जात आहे. यामुळे देशाच्या कानाकोपºयातून आलेल्यांचा लोंढा नवी मुंबईत स्थिरावत आहे. अशातच शहरात उभारी घेत असलेल्या आयटी क्षेत्रामुळे भरघोस पगारांच्या नोकºया उपलब्ध होवून दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यांच्याकडून गरज अथवा प्रतिष्ठा म्हणून वाहन खरेदीवर भर दिला जात असल्याने घरटी किमान एक दुचाकी व कार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात नवी मुंबईत दळणवळणासाठी ट्रेन, बेस्ट, एनएमएमटी, रिक्षा असे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय असतानाही अनेकांकडून खासगी वाहनांचा वापर होत आहे. शहरातील सुमारे १५ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ९ लाख लोक प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या कारणाने जवळ, लांबचा प्रवास वाहनाने करतात. तीन लाख प्रवासी एनएमएमटीने तर सुमारे दोन लाख प्रवासी बेस्टने प्रतिदिन प्रवास करतात, तर साधारण दीड लाख प्रवाशांकडून रिक्षाचा पर्याय निवडला जातो. उर्वरित निम्म्याहून अधिक प्रवाशांकडून खासगी वाहनांचा वापर होत असल्याने महत्त्वाच्या मार्गांवर, चौकांमध्ये, सिग्नलच्या ठिकाणी सतत वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.वाढत्या वाहतूककोंडीमुळे घाईमध्ये अनेक जण वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, वाहतूक पोलिसांवरही ताण वाढत आहे. वाढता वाहतुकीचा हा बोजवारा नियंत्रित करण्यासाठी वाढत चाललेल्या वाढती खासगी वाहनांची संख्या नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याबाबत जनजागृतीचीही आवश्यकता भासत आहे, अन्यथा येत्या काळात वाहतूककोंडीच्या बाबतीत नवी मुंबई दिल्लीला मागे टाकण्याची शक्यता आहे.च्प्रशासनाकडून शहरात स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक वाहनांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. यामुळे वाहनांच्या धुरामुळे होणाºया प्रदूषणालाही आळा बसेल. त्याकरिता अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीही सार्वजनिक वाहनांमधून प्रवासात पुढाकार घेण्याची गरज आहे.च्प्रवाशांच्या सोयीसाठी पालिकेकडून एनएमएमटी सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीला एनएमएमटीच्या ताफ्यात ४६५ बस असून वेगवेगळ्या ७५ मार्गांवर त्या चालवल्या जात आहेत. त्यामधून प्रतिदिन सुमारे ३ लाख प्रवासी शहराअंतर्गत अथवा शहराबाहेर प्रवास करतात.च्सार्वजनिक वाहनांऐवजी एकट्या व्यक्तीकडूनही प्रवासासाठी दुचाकी अथवा कारचा अशा खासगी वाहनांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडी होत आहे. भविष्यात ही वाहतूककोंडी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने खासगी वाहनांच्या वापरावर मर्यादा घालणे काळाची गरज बनले आहे.शहरात एकूण वाहनांची नोंद : 4,56,159

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई