शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

रिक्षा थांब्यांवर संघटनांची मक्तेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:20 IST

प्रवाशांवर अरेरावी : संघटना विरहित सर्वसमावेशक थांब्यांची मागणी

नवी मुंबई : शहरातील बहुतांश रिक्षा थांबे ठरावीक संघटनांनी ताब्यात घेतले आहेत. त्या ठिकाणी इतर रिक्षाचालकांना प्रवेश मिळत नसल्याने अशा रिक्षाचालकांना रस्त्यावर थांबावे लागत आहे, यामुळे संघटनांच्या जोरावर ठरावीक गटाची वाढती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्वसमावेशक थांबे तयार करण्याची मागणी होऊ लागली आहे.

शहरातील बस थांब्यांलगत, महत्त्वाच्या मार्गावर तसेच रेल्वेस्थानकांच्या बाहेर टॅक्सी व रिक्षाचालकांसाठी थांबे देण्यात आले आहेत. त्यापैकी काही थांबे ठरावीक संघटनांनी प्रशासनाकडे मागणी करून मिळवलेले आहेत. तर काही ठिकाणी संघटनांनीच आपसात संगनमताने थांब्यांवर स्वत:चे वर्चस्व तयार केले आहे, अशा थांब्यांवर संघटनेच्या सदस्य नसलेल्या रिक्षा थांबण्यास मज्जाव घातला जात आहे. यामुळे कोणत्याही संघटनेत सहभागी नसलेल्या रिक्षाचालकांना प्रवाशांच्या प्रतीक्षेत रस्त्यावर अथवा बस थांब्यावर थांबावे लागत आहे. परिणामी, शहरातील जास्त रहदारीच्या महत्त्वाच्या मार्गावरील बहुतांश बस थांब्यावरच रिक्षांचे अवैध थांबे तयार झाले आहेत. तर परमिट खुले केल्यापासून शहरात रिक्षांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचाही परिणाम रहदारीवर दिसून येत आहे.त्यामुळे रिक्षांचे थांबे कोणत्या एका संघटनेच्या ताब्यात न देता ते सर्वसमावेशक करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. बहुतांश संघटनांच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असून, राजकीय स्वार्थासाठी त्यांना मोक्याच्या जागी थांबे मिळवून दिले जात आहेत. मात्र, जे रिक्षाचालक संघटित नाहीत अथवा कोणत्या राजकीय छत्रछायेखाली नाहीत, ते तिथल्या थांब्यापासून वंचित राहत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडून जवळच थांबा तयार केला गेल्यास आपसात वादाचे प्रकार घडत आहेत. वाशी-कोपरखैरणे मार्गावर, नेरुळ रेल्वेस्थानकाच्या परिसरात, सीबीडीत तसेच घणसोलीत असे प्रकार सातत्याने घडत आहेत. घणसोली स्थानकाबाहेर गतवर्षी दोन संघटनांत दंगलीचा प्रकार घडला होता, तर वाशी-कोपरखैरणे मार्गावरील बस थांब्यांनाच रिक्षा थांब्याचे स्वरूप आले आहे. अशातच घणसोली रेल्वेस्थानकाबाहेर सिडको मार्फत नव्याने तयार होत असलेले दोन नवे रिक्षा थांबे वापरासाठी खुले होण्याअगोदरच त्या ठिकाणी ठरावीक संघटनांचे फलक झळकू लागले आहेत. याबाबत इतर रिक्षाचालकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली असून, ते थांबे सर्वच रिक्षाचालकांसाठी खुले करण्याची मागणी होऊ लागली आहे.शहरात अधिकृत रिक्षा थांब्यांची कमतरता असून, बहुतांश संघटनांनी स्थानिक पातळीवर वरदहस्त वापरून अनधिकृत थांबे तयार केले आहेत. त्यातही काही संघटना थांब्यावर स्वत:चाच हक्क गाजवत असल्याने वादाचे प्रकार घडत आहेत. दीड महिन्यांपूर्वी सीवूड येथील गायमुख चौकालगतच्या थांब्यावर अशाच प्रकारातून दोन संघटनांत वाद उफाळून आला होता, तर नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील थांब्यावर प्रवाशांना मीटरने भाडे नाकारून केवळ शेअर भाडेच स्वीकारले जाते. तर त्या ठिकाणी ठरावीक रिक्षाचालकांव्यतिरिक्त इतर रिक्षाचालकाने भाडे स्वीकारल्यास त्यास दमदाटीही केली जात आहे.ठरावीक संघटनांच्याच ताब्यात रिक्षा थांब्यांची जागा दिली जात असल्याने त्या ठिकाणी काही रिक्षाचालकांच्या मुजोरी प्रवृत्तीचे दर्शन घडत आहे. तर प्रवाशांवरही त्यांच्याच रिक्षात बसण्याची सक्ती करून इतर रिक्षाचालकांना दमदाटी केली जाते, यामुळे संघटनेच्या आडून रिक्षाचालकांची वाढत चाललेली आरेरावी थांबवण्यासाठी रिक्षांच्या थांब्यावरील ठरावीक संघटनांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वच रिक्षाचालकांना समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाNavi Mumbaiनवी मुंबई