शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सागरी व्यवसायासाठी आधुनिक सुविधा हव्यात - श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 09:37 IST

जागतिक सागरी आणि एक्झिम समुदायाला जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील अशा अनेक पायाभूत आवश्यक सोयी सुविधा जेएनपीटी बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 उरण : जागतिक सागरी आणि एक्झिम समुदायाला जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील अशा अनेक पायाभूत आवश्यक सोयी सुविधा जेएनपीटी बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जागतिक सागरी व्यापार व्यवसाय वृद्धीसाठी बंदरात अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला असून, त्या महत्त्वाच्या असल्याचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. नाईक यांनी जेएनपीटी येथील टर्मिनल्सला शुक्रवारी भेट दिली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी टर्मिनलसंबंधी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.जेएनपीटी येथील टर्मिनल्सच्या त्यांच्या भेटी दरम्यान, मंत्री यांनी बंदर भागधारकांशी संवाद साधला आणि पोर्टची कार्यक्षमता आणि क्षमता आणखी वाढविण्यासाठी टर्मिनल ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक तंत्रज्ञान-सक्षम ‘स्मार्ट पोर्ट इनिशिएटिव्ह’चा शोध घेतला.  याव्यतिरिक्त मंत्र्यांनी कार्यक्षम आणि कुशल क्रेन ऑपरेटर्सना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो व बंदर ऑपरेशन्सचा अविभाज्य आणि मुख्य भाग असलेल्या आरएमक्युसी क्रेन सिम्युलेटरचा अनुभव घेतला.बंदराच्या पाहणीनंतर जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी दरम्यान जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना बंदराच्या भविष्यातील विस्तार योजनांची माहिती दिली. तसेच जेएनपीटीने नुकत्याच सुरू केलेल्या ‘ड्वार्फ कंटेनर ट्रेन’ सेवा, कोस्टल बर्थ यासह व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचीही माहिती दिली. ग्रीन पोर्ट इनिशिएटिव्ह, मल्टी-प्रॉडक्ट सेझ, सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा, ड्राय पोर्ट्स, डिजिटायझेशन इनिशिएटिव्ह,  वाढवण बंदर आणि इतर जेएनपीटी बंदर अंतर्गत असलेल्या मल्टिमॉडल पायाभूत सुविधा व प्रकल्पांची प्रगती सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री नाईक यांचे जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी,  उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्वागत केले.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई