शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

कृषी बाजार योजनेस अल्प प्रतिसाद, मुंबईत ई-नाम कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 03:59 IST

मुंबई, पुण्यासह जवळपास ११ मार्केटमध्ये ही योजना फक्त कागदावरच असून तीन वर्षांत एक रुपयाचीही उलाढाल झालेली नाही. ​​​​​​​

- नामदेव मोरेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेस राज्यात अद्याप समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. ३0५ पैकी फक्त ६0 बाजार समित्या ई-नामशी जोडण्यात आल्या असून त्यापैकी ३२ मार्केटमध्येच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री आॅनलाइन लिलाव पद्धतीने सुरू आहे. मुंबई, पुण्यासह जवळपास ११ मार्केटमध्ये ही योजना फक्त कागदावरच असून तीन वर्षांत एक रुपयाचीही उलाढाल झालेली नाही.कृषी व्यापारामध्ये पारदर्शीपणा आणून शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठी राष्ट्रीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली आहे. एप्रिल २0१६ मध्ये यासाठीचे पोर्टल सुरू करण्यात आले असून सद्य:स्थितीमध्ये देशातील ५८५ बाजार समित्या ई-नामशी जोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ३0५ बाजार समित्या असून त्यापैकी फक्त ६0 या योजनेशी जोडण्यात आल्या आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये २0१७ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. बाजार समितीने कृषी माल ई-नाम लिलाव कक्ष व प्रयोगशाळाही सुरू केली आहे. शासनाच्या पोर्टलवर व्यापारी व अडत्यांची नोंदणीही केली आहे. परंतु तीन वर्षांमध्ये एक रुपयाचीही उलाढाल या माध्यमातून झालेली नाही. मुंबईप्रमाणे, पुणे, खामगाव, सांगली, सोलापूर, लोणारसह १२ बाजार समित्यांमध्ये फेब्रुवारी २0२0 मध्ये उलाढालच झालेली नाही.या योजनेसाठी नोंदीत झालेल्या फक्त ३२ बाजार समित्यांमध्येच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त मालाची आॅनलाइन पद्धतीने विक्री होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनीही या योजनेला विरोध केला आहे. येथे प्रतिदिन १२ ते १५ हजार टन कृषी माल रोज विक्रीसाठी येत असतो. ई-नामप्रमाणे हा माल विकणे प्रत्यक्षात शक्य नाही. ही पद्धत व्यवहार्य नसल्याची भूमिका व्यापाºयांनी घेतली आहे. प्रशासनाने व्यापाºयांमध्ये जनजागृती केल्यानंतरही त्यास प्रतिसाद मिळत नाही. कृषी पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक एम.एल. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ई-नाम योजनेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंमलबजावणी करताना येणाºया अडचणी केंद्र शासनासही कळविण्यात आल्या असून या योजनेस पूर्वीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ई-नाम योजनेचा तपशीलदेशातील ५८५ मार्केट ई-नामयोजनेशी जोडण्यात आले आहेत.देशातील १ लाख २७ हजार व्यापारीव अडत्यांची नोंदणी झाली आहे.राज्यातील ३0५ पैकी ६0 मंडई ई-नामशी जोडल्या असून १६,७२४ व्यापाºयांची नोंदणी झालेली आहे.ई-नामच्या माध्यमातून अल्प व्यवहार होणाºया बाजार समित्यामुंबई, पुणे, धुळे, खामगाव, सांगली, सोलापूर, लोणार, अहेरीसमाधानकारक व्यवहार सुरू असलेल्या बाजार समित्यानेवासा, पिंपळगाव, अंजनगाव सुरजी, औरंगाबाद, हिंगोली, सेलू, अर्जुनी मोरगाव, कराड, गोंदिया

टॅग्स :agricultureशेतीNavi Mumbaiनवी मुंबई