शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मूळ प्रस्ताव आमचाच - मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 02:40 IST

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे

नवी मुंबई  - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे; परंतु महापालिकेच्या या निर्णयाला सत्ताधारी राष्ट्रवादीचा निवडणूक अजेंडा असल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मुळात २0१७ मध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता दिली होती; परंतु त्याचे श्रेय भाजपला मिळू नये, म्हणून सत्ताधाऱ्यांनी दोन वर्षे हा प्रस्ताव अडकवून ठेवला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रस्तावाला मंजुरी देऊन सत्ताधाºयांनी राजकीय खेळी केल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.निवासयोग्य सर्वोत्कृष्ट शहर म्हणून नवी मुंबईचा गवगवा होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षेविषयक यंत्रणासुद्धा तितक्याच सक्षम असाव्यात, नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, या उद्देशाने महापालिकेने शहराच्या प्रमुख ५३० ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंगळवारी सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली आहे. शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने घेतलेला हा निर्णय स्तुत्य असला तरी यामागील मूळ कल्पना आपली असल्याचे मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर नवी मुंबईचा लौकिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची सुरक्षाही तितकीच सक्षम असावी, या दृष्टिकोनातून नवी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये नवी मुंबईच्या विविध भागात १४९३ सीसीटीव्ही बसविण्यास मान्यता दिली होती. तशा सूचना महापालिकेला केल्या होत्या; परंतु याचे श्रेय आपणाला मिळू नये, म्हणून सत्ताधाºयांनी दोन वर्षे हा प्रस्ताव बारगळत ठेवला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.राष्ट्रवादीचाही पलटवारराष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी मंदा म्हात्रे या सीसीटीव्ही कॅमेºयाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याची टीका केली आहे. २०१७ मध्ये नवी मुंबईमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविली असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे; परंतु तशी मंजुरी मिळाली होती तर प्रत्यक्ष कॅमेरे का बसले नाहीत, शासनाकडून निधी का आणला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिकेच्या निधीमधून यापूर्वी २८२ कॅमेरे बसविण्यात आले होते व आता १४३९ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे व महापालिकेचे श्रेय असून आमदारांची श्रेय लाटण्यासाठी धडपड सुरू असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीNavi Mumbaiनवी मुंबई