शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मूळ प्रस्ताव आमचाच - मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 02:40 IST

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे

नवी मुंबई  - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे; परंतु महापालिकेच्या या निर्णयाला सत्ताधारी राष्ट्रवादीचा निवडणूक अजेंडा असल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मुळात २0१७ मध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता दिली होती; परंतु त्याचे श्रेय भाजपला मिळू नये, म्हणून सत्ताधाऱ्यांनी दोन वर्षे हा प्रस्ताव अडकवून ठेवला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रस्तावाला मंजुरी देऊन सत्ताधाºयांनी राजकीय खेळी केल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.निवासयोग्य सर्वोत्कृष्ट शहर म्हणून नवी मुंबईचा गवगवा होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षेविषयक यंत्रणासुद्धा तितक्याच सक्षम असाव्यात, नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, या उद्देशाने महापालिकेने शहराच्या प्रमुख ५३० ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंगळवारी सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली आहे. शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने घेतलेला हा निर्णय स्तुत्य असला तरी यामागील मूळ कल्पना आपली असल्याचे मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर नवी मुंबईचा लौकिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची सुरक्षाही तितकीच सक्षम असावी, या दृष्टिकोनातून नवी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये नवी मुंबईच्या विविध भागात १४९३ सीसीटीव्ही बसविण्यास मान्यता दिली होती. तशा सूचना महापालिकेला केल्या होत्या; परंतु याचे श्रेय आपणाला मिळू नये, म्हणून सत्ताधाºयांनी दोन वर्षे हा प्रस्ताव बारगळत ठेवला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.राष्ट्रवादीचाही पलटवारराष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी मंदा म्हात्रे या सीसीटीव्ही कॅमेºयाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याची टीका केली आहे. २०१७ मध्ये नवी मुंबईमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविली असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे; परंतु तशी मंजुरी मिळाली होती तर प्रत्यक्ष कॅमेरे का बसले नाहीत, शासनाकडून निधी का आणला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिकेच्या निधीमधून यापूर्वी २८२ कॅमेरे बसविण्यात आले होते व आता १४३९ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे व महापालिकेचे श्रेय असून आमदारांची श्रेय लाटण्यासाठी धडपड सुरू असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीNavi Mumbaiनवी मुंबई