शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

ग्रामपंचायत विभागाचे शिक्षण विभागात स्थलांतर, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यालय हलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:36 AM

पनवेल : पंचायत समिती पनवेल येथील ग्रामपंचायत विभाग शिक्षण विभागाच्या हॉलमध्ये हलविण्यात आला आहे.

मयूर तांबडे पनवेल : पंचायत समिती पनवेल येथील ग्रामपंचायत विभाग शिक्षण विभागाच्या हॉलमध्ये हलविण्यात आला आहे. कार्यालयांची झालेली दयनीय अवस्था पाहता सुरक्षेच्या कारणास्तव हे स्थलांतर करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पनवेल पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या सहा ते सात वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संपूनही ही इमारत बांधून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाला जुन्याच इमारतीत जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पनवेल पंचायत समितीच्या जुन्या इमारतीवर प्लास्टिकचे कापड टाकण्यात आले आहे.नव्या इमारतीचे काम रखडल्याने जुन्या कार्यालयावर कापड टाकून कामकाज करण्यावर भर दिला जात आहे. पनवेल पंचायत समितीत रोज शेकडो नागरिक कामानिमित्त ये-जा करत असतात. मात्र, इमारतीचे काम रखडलेले असल्याने याच जुन्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाºयांना काम करावे लागते. उंदीर, घुशी यांचा वावर येथे वाढला आहे. इमारतीचे कामकाज रखडल्यामुळे कर्मचारी व अधिकाºयांना जीव धोक्यात घालून येथे काम करावे लागते. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी गत या ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांची झाली आहे. त्यामुळे या कार्यालयीन दुरवस्थेला व नव्या इमारतीच्या प्रतीक्षेला कर्मचारी वर्ग पुरता वैतागला आहे.तालुका पंचायत समितीच्या इमारतीचे काम सहा वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. पंचायत समितीची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या जागेवर ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर नूतन वास्तूचे बांधकाम २०१० साली हाती घेण्यात आले आहे. प्रशासकीय भवनबरोबर या ठिकाणी व्यापारी संकुलही उभारण्यात येणार आहे. त्यातील गाळे संबंधित बिल्डरला देण्यात आले असून, तो त्याची विक्र ी करणार असल्याचे करारात नमूद आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे ठरलेले असताना जवळपास सात वर्षे होत आली तरी तो अर्धवट स्थितीत आहे. जुन्या पंचायत समितीच्या कार्यालयात काम करणेही अधिकाºयांना अवघड होऊन बसले आहे. येथील कार्यालयांना ठिकठिकाणी तडे गेल्याने ते कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.याच कारणांमुळे ग्रामपंचायत विभाग शेजारीच असलेल्या शिक्षण विभागाच्या हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे.>कर्मचाºयांचा जीव धोक्यातइमारतीचे काम रखडलेले असल्याने याच जुन्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाºयांना काम करावे लागते. उंदीर, घुशी यांचा वावर येथे वाढला आहे. इमारतीचे कामकाज रखडल्यामुळे कर्मचारी व अधिकाºयांना जीव धोक्यात घालून येथे काम करावे लागते.