शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

वाशीतील उद्यानामध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 00:08 IST

दोन मद्यपी जखमी; स्थानिकांकडून कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई : वाशीमधील जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान मद्यपी व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. गांजा ओढणारे व सेवन करणाऱ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कडक कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महान देशभक्ताचे नाव असलेल्या उद्यानामध्ये सुरू असलेले हे प्रकार थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाशी सेक्टर १० मधील उद्यानाला महानगरपालिकेने जनरल अरुणकुमार वैद्य यांचे नाव दिले आहे. भारताचे १३ वे भूदलप्रमुख असलेल्या वैद्य यांना १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीसाठी महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामधील कामगिरीसाठी त्यांना दुसऱ्यांना महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पराक्रमाची आठवण शहरवासीयांना व्हावी, यासाठी उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे; परंतु मागील काही महिन्यांपासून या उद्यानामध्ये मद्यपी व गांजासह इतर अमली पदार्थ ओढणाºया तरुणांचा अड्डा तयार झाला आहे.

दिवसरात्र उद्यानामध्ये तरुण नशा करत बसलेले असतात. त्यामुळे उद्यानाजवळून जाण्यासही नागरिकांना भीती वाटू लागली आहे. हे उद्यान नागरिकांसाठी बंदही करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर यांनी मद्यपी व अमली पदार्थ ओढणाºयांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार पोलिसांकडे केली आहे. महापालिकेकडे पाठपुरावा करून येथे सुरक्षारक्षकांचीही नियुक्ती केली आहे. यानंतरही गर्दुल्ल्यांचा अड्डा बंद झालेला नाही. कोणी आक्षेप घेतल्यास त्यांना धमकावले जाते व मारहाणही केली जात आहे.उद्यानामध्ये अमली पदार्थ ओढणाºया तरुणांमध्ये नुकतीच हाणामारी झाली. यामध्ये दोन तरुण जखमी असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा प्रकारचा राडा या परिसरामध्ये वारंवार होत असतो.

नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाकडे जाताना उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पानटपरीजवळ अमली पदार्थ ओढणारे एकत्र येत असतात. येथेच त्यांना अमली पदार्थ पुरविणारेही येत असतात. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून मारामारीही होत असते. या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत येथील अड्डा पूर्णपणे बंद झाला नाही तर भविष्यात एखाद्याचा खून होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याविषयी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याविषयी लवकरच पोलीस आयुक्त संजय कुमार यांना पुन्हा निवेदन देण्यात येणार आहे.

उपोषणाला बसण्याचा रहिवाशांचा इशारा

वाशी सेक्टर १० मधील उद्यानाजवळील अमली पदार्थांचे सेवन करणाºयांचा अड्डा कायमस्वरूपी बंद व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे रहिवाशांमधील असंतोष वाढू लागला आहे. वेळेत ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर उपोषण करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई