शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

उरण-जेएनपीटीतील वाहतूककोंडीप्रकरणी बैठक, श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:43 IST

उरण-जेएनपीटी परिसरात दररोज उद्भवणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

उरण : उरण-जेएनपीटी परिसरात दररोज उद्भवणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्ते-उड्डाणपूल, कॉरिडोरच्या कामास होत असलेला विलंब, अनधिकृत कंटेनर यार्ड, बेशिस्त वाहतूक, वाढती रहदारी अशा अनेक कारणांमुळे परिसरात वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून उपाययोजनांबाबत होत असलेल्या विलंबाबाबत जाब विचारला. जेएनपीटी आणि गव्हाणफाटा-चिरनेर महामार्गावरील वाहतूककोंडीची काळजी घेण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही बारणे यांनी या वेळी दिल्या.जेएनपीटी-उरण परिसरातील विविध महामार्गावर नियमित वाहतूककोंडी होत असल्याने चालकांसह नागरिक, प्रवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या मागणीवरून जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी, जेएनपीटी प्रशासन भवनात बैठक बोलावली होती. बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत नवी मुंबई वाहतूक नियंत्रक शाखेचे डीसीपी सुनील लोखंडे, एसीपी राजेंद्र चव्हाण, उरण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे, जेएनपीटी प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे, मनीषा जाधव, एनएचआय अध्यक्ष प्रशांत फेगडे, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख तथा जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, विविध बंदरांचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.अनधिकृत कंटेनर गोदामांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने बहुतांशी अवजड वाहने महामार्गालगत उभी केली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होत असून सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत असल्याची कैफियत स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडली. या अनधिकृत कंटेनर गोदामांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. वाहतूक पोलिसांना कर्मचारी कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवून देण्याची मागणी व करळफाटा महामार्गावर २४ तास रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी केली. यावर जेएनपीटी कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी, जेएनपीटीतील तीन टर्मिनलने प्रत्येकी २० प्रमाणे ६० सुरक्षारक्षक वाहतूक पोलिसांच्या मदतीला द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यात चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरील वाहनांना जेएनपीटी महमार्गावर जाण्याचा मार्ग गव्हाणफाटा येथून काढावा, त्यामुळे मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्याला मदत होईल, अशी मागणीही त्यांनी केली. यावर उत्तर देताना वनविभागाच्या अडचणींमुळे हे काम थांबले आहे. मात्र, हे काम एनएचआय अधिकाºयांनी पूर्ण करून देण्याचे मान्य केले. गोदामांचा सर्व्हे करण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली.जेएनपीटी महामार्गावरील पथदिवे बंद असून ते चालू करावेत, असे न्हावाशेवा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी सुचविले. परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे, अशी सूचना बारणे यांनी अधिकाºयांना केली. एक महिन्यांनी यावर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.वाहतूक सुरक्षेअभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईत तोडण्यात आलेल्या जुन्या इमारतींचे डेब्रिजही उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आणले जात आहेत. रात्रीच्या वेळी १५० ते २०० डम्परमधून डेब्रिज आणले जात असल्याने वाहतूककोंडी होते. त्यावरही तत्काळ कारवाई करण्याची मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटी