शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्गावर उपाययोजना; गटारांचेही काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:11 AM

खारघर हिरानंदानी ते बेलापूर उड्डाणपूल येथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. त्यामुळे पाणी साचून पावसाळ्यात अडचणी येत असत.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचू नये, त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घेतली आहे. पावसाळी नाले साफ करण्याबरोबरच ज्या ठिकाणी पावसाच्या निचरा होण्यासाठी जागा नाही. या ठिकाणी पदपथ खोदून मोरी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

पावसाळा आला पनवेल-सायन महामार्गावर जाणे-येणे खूपच जिकिरीचे बनत होते. सांगायचे झाले तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडत होते त्यामुळे वाहतूककोंडी होत होती. खारघर ते बेलापूर हे अंतर कापण्यासाठी कधी कधी एक तास लागत होता. त्यावर उपाययोजना म्हणून ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडत होते, अशा पुलावर सिमेंट काँक्र ीटीकरण करण्यात आले आहे. याशिवाय पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीला अडथळा येत होता. कित्येक वेळा वाहने बंद पडतात. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कळंबोली कॉलनी ते कामोठे बस स्टॉप या पर्यंत काँक्रीट गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच कोपरा या ठिकाणी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

खारघर हिरानंदानी ते बेलापूर उड्डाणपूल येथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. त्यामुळे पाणी साचून पावसाळ्यात अडचणी येत असत. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने पद खोदून महामार्गावरील पावसाचे पाणी बाजूच्या नाल्यामध्ये वाहून जावे याकरिता प्रत्येक दहा मीटर अंतरावर मोरी काढण्यात आल्या आहेत. त्या काँक्रीट करून त्याच्यावर पुन्हा अच्छादन करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ, खारघर रेल्वेस्थानकासमोर काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही दिवसांत ते पूर्णत्वास येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी साचून रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही, असा विश्वासही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.