शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

माथाडी कामगारांचे आंदोलन स्थगीत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा यशस्वी

By नामदेव मोरे | Updated: February 29, 2024 20:36 IST

यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

नवी मुंबई : माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी ११ सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

           माथाडी कायदा सुधारणा विधेयक ३४ व २०२८ चे सुधारणा विधेयक ६४ रद्द करण्याच्या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीने २६ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते. आंदोलनाची दखल घेवून गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. कृती समितीच्या मागण्या समजून घेतल्या. माथाडी कामगार सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी एक सर्वसाधारण समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये ११ सदस्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये शासनाच्या कामगार, नगर विकास, पणन, गृह खात्याचे सचिव, माथाडी मंडळांचे सचीव, विविध माथाडी कामगार नेत्यांचा समावेश असणार आहे. समितीने तीन महिन्यात सुधारणा विधेयकावर चर्चा करून प्रस्ताव सादर करावा. तो पर्यंत सुधारणा विधेयक प्रलंबीत ठेवण्यात येणार आहे.

            याविषयीचा निर्णयाचे पत्र सार्वजनीक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आझाद मैदानावर येवून कामगार नेते बाबा आढाव यांच्याकडे दिले. यानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले. कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शासन आणि कृती समितीमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. उपाेषणाच्या शेवटी बाबा आढाव यांनी भुमीका स्पष्ट केली. तीन महिन्यांच्या कालावधीत माथाडी मंडळाचा घसरलेला कारभार सुधारला पाहिजे. माथाडींच्या क्षेत्रात कोणी गुंडगिरी करत असतील तर आम्ही त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असे मत व्यक्त केले. आमच्यातले जर कोणी गुंंडगिरी करत असतील तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असे स्पष्ट केले. नरेंद्र पाटील यांनी उपोषण यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. 

टॅग्स :agitationआंदोलनNavi Mumbaiनवी मुंबई