शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचा शेतकऱ्यांना न्याय

By admin | Updated: October 13, 2015 02:11 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते. बाजार समिती प्रशासन व संचालकांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये मिळवून दिले आहेत. जामीनदारांकडून पैसे वसूल केल्याची ही राज्यातील पहिली घटना आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करणाऱ्या राधेशाम मोरया या व्यापाऱ्याने गतवर्षी आत्महत्या केली होती. यामुळे त्यांच्याकडे कृषी माल पाठविणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडण्याची भीती व्यक्त झाली होती. शेतकऱ्यांचे पैसे कसे वसूल करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. बाजार समितीमध्ये विश्वासाने शेतकरी त्यांचा माल पाठवित असतात. शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी व्यापाऱ्यांप्रमाणे बाजार समितीही घेत असते. मोरया यांनी आत्महत्या केल्यामुळे तत्कालीन संचालक अशोक वाळुंज व बाजार समिती प्रशासनाने सदर व्यापाऱ्याला अडत्याचे लायसन्स देताना जामीनदार असलेल्यांकडून पाच लाख रुपये वसूल केले आहेत. यामधील बाजार फी कपात करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये परत देण्यात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रथमच जामीनदाराकडून पैसे वसूल करून ते शेतकऱ्यांना देण्यात आल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी याविषयी बाजार समितीचे आभार मानले आहेत. सदर पैसे परत देताना बाजार समितीचे सचिव शिवाजीराव पहिनकर, माजी संचालक अशोक वाळुंज व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)