शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

बाजार समितीचा शेतकऱ्यांना न्याय

By admin | Updated: October 13, 2015 02:11 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते. बाजार समिती प्रशासन व संचालकांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये मिळवून दिले आहेत. जामीनदारांकडून पैसे वसूल केल्याची ही राज्यातील पहिली घटना आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करणाऱ्या राधेशाम मोरया या व्यापाऱ्याने गतवर्षी आत्महत्या केली होती. यामुळे त्यांच्याकडे कृषी माल पाठविणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडण्याची भीती व्यक्त झाली होती. शेतकऱ्यांचे पैसे कसे वसूल करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. बाजार समितीमध्ये विश्वासाने शेतकरी त्यांचा माल पाठवित असतात. शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी व्यापाऱ्यांप्रमाणे बाजार समितीही घेत असते. मोरया यांनी आत्महत्या केल्यामुळे तत्कालीन संचालक अशोक वाळुंज व बाजार समिती प्रशासनाने सदर व्यापाऱ्याला अडत्याचे लायसन्स देताना जामीनदार असलेल्यांकडून पाच लाख रुपये वसूल केले आहेत. यामधील बाजार फी कपात करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये परत देण्यात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रथमच जामीनदाराकडून पैसे वसूल करून ते शेतकऱ्यांना देण्यात आल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी याविषयी बाजार समितीचे आभार मानले आहेत. सदर पैसे परत देताना बाजार समितीचे सचिव शिवाजीराव पहिनकर, माजी संचालक अशोक वाळुंज व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)