शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नवी मुंबईकरांनी बजावली आईच्या मायेची भूमिका, दोन दिवसांत १० लाख नागरिकांना अन्नदान

By नामदेव मोरे | Updated: January 28, 2024 07:36 IST

Maratha Reservation: नवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दो

- नामदेव मोरेनवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन दिवसांत दहा लाख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. बाजार समितीमध्ये एका वेळी दोन लाख नागरिकांसाठी स्वयंपाक करता येण्याची सोय करण्यात आली होती. मराठा समाजाने प्रत्येक घरातून चार भाकरी, भाजी संकलित करून अन्नदात्याची भूमिका बजावली. यामध्ये बाजार समितीमध्ये व्यापारी, कामगारांनी सिंहाचा वाटा उचलला होता. नवी मुंबईकरांनी आईच्या मायेने केलेल्या आदरातिथ्याने समाजबांधव भारावून गेले होते.

नवी मुंबई मराठ्यांच्या निर्णायक लढ्याची साक्षीदार ठरली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे निघालेल्या दिंडीचा मुक्काम २५ जानेवारीला नवी मुंबईत पडला होता. आंदोलकांना सर्वप्रकारच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी सकल मराठा समाज नवी मुंबईने घेतली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने राहण्यासाठी पाच मार्केट उपलब्ध करून दिली. बाजार समिती व वाशी ते तुर्भे परिसरातील सर्व रस्ते, मोकळ्या जागांवर मराठ्यांचा तळ पडला होता. बाजार समितीने शौचालय, पाणी, राहण्यासाठी जागा या सर्व सुविधा दिल्यानंतरही जेवण पुरविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. बाजार समितीमधील व्यापारी व माथाडी कामगारांनी अन्नदानाची जबाबदारी घेतली. प्रत्येक मार्केटमध्ये सामूहिक किचन तयार केले. एकाच वेळी दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांसाठी अन्न शिजवून त्याच्या वितरणाची यंत्रणा तयार केली. व्यापारी व कामगार स्वत: सर्व जबाबदारी पार पाडत होते. सकल मराठा समाजाने ‘चार भाकरी प्रेमाच्या’ संकल्पना राबविली. या माध्यमातून प्रत्येक घरातून भाजी, भाकरी, चटणी संकलित करण्यात आली. दोन दिवसांमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त भाकरी संकलित झाल्या होत्या. याशिवाय पुलाव, भात आमटीचीही सोय केली होती. 

विभागनिहाय अन्नदानबाजार समिती परिसरात दोन दिवसांत १० लाख नागरिक जेवल्याचा अंदाज आहे. नेरूळमध्ये चार ठिकाणी, सानपाडा व इतर ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती. अनेक आंदोलकांनी स्वत: स्वयंपाक करण्यासही प्राधान्य दिले होते. 

परतीच्या प्रवासात शनिवारी नवी मुंबईपासून पनवेलपर्यंत अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी समाजबांधवांनी चहा-बिस्किटे, नास्ता याची सोय केली होती. 

मार्केटनिहाय जबाबदारीकांदा मार्केट : २५ हजार फळ मार्केट : २५ हजार भाजीपाला मार्केट : २५ हजार धान्य मार्केट : ६० हजार मसाला मार्केट : ५० हजार विस्तारित भाजी मार्केट : २० हजार 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई