शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नवी मुंबईकरांनी बजावली आईच्या मायेची भूमिका, दोन दिवसांत १० लाख नागरिकांना अन्नदान

By नामदेव मोरे | Updated: January 28, 2024 07:36 IST

Maratha Reservation: नवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दो

- नामदेव मोरेनवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन दिवसांत दहा लाख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. बाजार समितीमध्ये एका वेळी दोन लाख नागरिकांसाठी स्वयंपाक करता येण्याची सोय करण्यात आली होती. मराठा समाजाने प्रत्येक घरातून चार भाकरी, भाजी संकलित करून अन्नदात्याची भूमिका बजावली. यामध्ये बाजार समितीमध्ये व्यापारी, कामगारांनी सिंहाचा वाटा उचलला होता. नवी मुंबईकरांनी आईच्या मायेने केलेल्या आदरातिथ्याने समाजबांधव भारावून गेले होते.

नवी मुंबई मराठ्यांच्या निर्णायक लढ्याची साक्षीदार ठरली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे निघालेल्या दिंडीचा मुक्काम २५ जानेवारीला नवी मुंबईत पडला होता. आंदोलकांना सर्वप्रकारच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी सकल मराठा समाज नवी मुंबईने घेतली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने राहण्यासाठी पाच मार्केट उपलब्ध करून दिली. बाजार समिती व वाशी ते तुर्भे परिसरातील सर्व रस्ते, मोकळ्या जागांवर मराठ्यांचा तळ पडला होता. बाजार समितीने शौचालय, पाणी, राहण्यासाठी जागा या सर्व सुविधा दिल्यानंतरही जेवण पुरविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. बाजार समितीमधील व्यापारी व माथाडी कामगारांनी अन्नदानाची जबाबदारी घेतली. प्रत्येक मार्केटमध्ये सामूहिक किचन तयार केले. एकाच वेळी दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांसाठी अन्न शिजवून त्याच्या वितरणाची यंत्रणा तयार केली. व्यापारी व कामगार स्वत: सर्व जबाबदारी पार पाडत होते. सकल मराठा समाजाने ‘चार भाकरी प्रेमाच्या’ संकल्पना राबविली. या माध्यमातून प्रत्येक घरातून भाजी, भाकरी, चटणी संकलित करण्यात आली. दोन दिवसांमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त भाकरी संकलित झाल्या होत्या. याशिवाय पुलाव, भात आमटीचीही सोय केली होती. 

विभागनिहाय अन्नदानबाजार समिती परिसरात दोन दिवसांत १० लाख नागरिक जेवल्याचा अंदाज आहे. नेरूळमध्ये चार ठिकाणी, सानपाडा व इतर ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती. अनेक आंदोलकांनी स्वत: स्वयंपाक करण्यासही प्राधान्य दिले होते. 

परतीच्या प्रवासात शनिवारी नवी मुंबईपासून पनवेलपर्यंत अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी समाजबांधवांनी चहा-बिस्किटे, नास्ता याची सोय केली होती. 

मार्केटनिहाय जबाबदारीकांदा मार्केट : २५ हजार फळ मार्केट : २५ हजार भाजीपाला मार्केट : २५ हजार धान्य मार्केट : ६० हजार मसाला मार्केट : ५० हजार विस्तारित भाजी मार्केट : २० हजार 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई