शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांनी बजावली आईच्या मायेची भूमिका, दोन दिवसांत १० लाख नागरिकांना अन्नदान

By नामदेव मोरे | Updated: January 28, 2024 07:36 IST

Maratha Reservation: नवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दो

- नामदेव मोरेनवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन दिवसांत दहा लाख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. बाजार समितीमध्ये एका वेळी दोन लाख नागरिकांसाठी स्वयंपाक करता येण्याची सोय करण्यात आली होती. मराठा समाजाने प्रत्येक घरातून चार भाकरी, भाजी संकलित करून अन्नदात्याची भूमिका बजावली. यामध्ये बाजार समितीमध्ये व्यापारी, कामगारांनी सिंहाचा वाटा उचलला होता. नवी मुंबईकरांनी आईच्या मायेने केलेल्या आदरातिथ्याने समाजबांधव भारावून गेले होते.

नवी मुंबई मराठ्यांच्या निर्णायक लढ्याची साक्षीदार ठरली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे निघालेल्या दिंडीचा मुक्काम २५ जानेवारीला नवी मुंबईत पडला होता. आंदोलकांना सर्वप्रकारच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी सकल मराठा समाज नवी मुंबईने घेतली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने राहण्यासाठी पाच मार्केट उपलब्ध करून दिली. बाजार समिती व वाशी ते तुर्भे परिसरातील सर्व रस्ते, मोकळ्या जागांवर मराठ्यांचा तळ पडला होता. बाजार समितीने शौचालय, पाणी, राहण्यासाठी जागा या सर्व सुविधा दिल्यानंतरही जेवण पुरविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. बाजार समितीमधील व्यापारी व माथाडी कामगारांनी अन्नदानाची जबाबदारी घेतली. प्रत्येक मार्केटमध्ये सामूहिक किचन तयार केले. एकाच वेळी दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांसाठी अन्न शिजवून त्याच्या वितरणाची यंत्रणा तयार केली. व्यापारी व कामगार स्वत: सर्व जबाबदारी पार पाडत होते. सकल मराठा समाजाने ‘चार भाकरी प्रेमाच्या’ संकल्पना राबविली. या माध्यमातून प्रत्येक घरातून भाजी, भाकरी, चटणी संकलित करण्यात आली. दोन दिवसांमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त भाकरी संकलित झाल्या होत्या. याशिवाय पुलाव, भात आमटीचीही सोय केली होती. 

विभागनिहाय अन्नदानबाजार समिती परिसरात दोन दिवसांत १० लाख नागरिक जेवल्याचा अंदाज आहे. नेरूळमध्ये चार ठिकाणी, सानपाडा व इतर ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती. अनेक आंदोलकांनी स्वत: स्वयंपाक करण्यासही प्राधान्य दिले होते. 

परतीच्या प्रवासात शनिवारी नवी मुंबईपासून पनवेलपर्यंत अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी समाजबांधवांनी चहा-बिस्किटे, नास्ता याची सोय केली होती. 

मार्केटनिहाय जबाबदारीकांदा मार्केट : २५ हजार फळ मार्केट : २५ हजार भाजीपाला मार्केट : २५ हजार धान्य मार्केट : ६० हजार मसाला मार्केट : ५० हजार विस्तारित भाजी मार्केट : २० हजार 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई