शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वाटल्यास आजची रात्र वाशीत मुक्काम करतो, पण...; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 16:30 IST

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

नवी मुंबई - सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आजच काढा. ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्यात तर प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढेपर्यंत हवंतर इथेच थांबतो. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश सकाळी ११ पर्यंत काढा. तोपर्यंत आम्ही वाशीतच थांबू. आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय उद्या १२ वाजता घेऊ अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सामान्य विभागाचे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्याकडे आले होते. सरकारचे मंत्री चर्चेला आले नाहीत पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर त्या प्रमाणपत्राचे तुम्ही वाटप करा. नोंदी कुणाच्या सापडल्या त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात यादी चिटकवा. ज्याला नोंद मिळाली हे माहिती नसेल मग तो अर्ज कसा करणार? त्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केलेत. नोंदीही ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात केली. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या कुटुंबाला याआधारे प्रमाणपत्रे देण्यात यावे. एका नोंदीवर ५० ते १५० जणांना फायदा होतोय. यामुळे २ कोटी मराठा आरक्षणात जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ३७ लाख लोकांना आम्ही प्रमाणपत्रे वाटप केलेत असं सरकारने सांगितले आहे. ज्या लोकांच्या नोंदी झाल्यात त्यांचा डेटा आम्ही मागितला आहे. शिंदे समिती रद्द करू नये. या समितीची मुदत वर्षभर वाढवा अशी मागणी आपण केली. त्यावर टप्प्याटप्प्याने वाढवू असं सरकारने सांगितले. ज्याची नोंद मिळाली त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावेत. त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. आपल्यासाठी अध्यादेश महत्त्वाचा आहे. ५४ लाख बांधवांच्या कुटुंबात आणि सगेसोयरे यांना प्रमाणपत्र द्यायचे असेल तर ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांनी शपथपत्रे द्यायची. त्या शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्रे दिली जाईल. शपथपत्र मोफत करावे अशी मागणी आम्ही सरकारला केली. ती सरकारने मान्य केली असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. 

दरम्यान, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायच्या नाहीत. जर शासकीय भरती करायच्या असल्या तर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेऊन करायच्या अशी मागणी आपण केली. त्यावर राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देऊ असं सरकारने सांगितले पण मुलांचे काय?. सरकारने आजच्या रात्री हा अध्यादेश द्यावा. आम्ही वाटलं तर आजची रात्र इथेच काढतो. आज आझाद मैदानाकडे जात नाही. परंतु मुंबई सोडत नाही. अध्यादेशावर अभ्यास करतो. त्यात काही चुकीचे आहे का यावर रात्रभर अभ्यास करतो. जर आज अध्यादेश नाही दिला तर उद्या मी आझाद मैदानावर जाणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण