शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वाटल्यास आजची रात्र वाशीत मुक्काम करतो, पण...; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 16:30 IST

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

नवी मुंबई - सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आजच काढा. ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्यात तर प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढेपर्यंत हवंतर इथेच थांबतो. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश सकाळी ११ पर्यंत काढा. तोपर्यंत आम्ही वाशीतच थांबू. आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय उद्या १२ वाजता घेऊ अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सामान्य विभागाचे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्याकडे आले होते. सरकारचे मंत्री चर्चेला आले नाहीत पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर त्या प्रमाणपत्राचे तुम्ही वाटप करा. नोंदी कुणाच्या सापडल्या त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात यादी चिटकवा. ज्याला नोंद मिळाली हे माहिती नसेल मग तो अर्ज कसा करणार? त्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केलेत. नोंदीही ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात केली. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या कुटुंबाला याआधारे प्रमाणपत्रे देण्यात यावे. एका नोंदीवर ५० ते १५० जणांना फायदा होतोय. यामुळे २ कोटी मराठा आरक्षणात जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ३७ लाख लोकांना आम्ही प्रमाणपत्रे वाटप केलेत असं सरकारने सांगितले आहे. ज्या लोकांच्या नोंदी झाल्यात त्यांचा डेटा आम्ही मागितला आहे. शिंदे समिती रद्द करू नये. या समितीची मुदत वर्षभर वाढवा अशी मागणी आपण केली. त्यावर टप्प्याटप्प्याने वाढवू असं सरकारने सांगितले. ज्याची नोंद मिळाली त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावेत. त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. आपल्यासाठी अध्यादेश महत्त्वाचा आहे. ५४ लाख बांधवांच्या कुटुंबात आणि सगेसोयरे यांना प्रमाणपत्र द्यायचे असेल तर ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांनी शपथपत्रे द्यायची. त्या शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्रे दिली जाईल. शपथपत्र मोफत करावे अशी मागणी आम्ही सरकारला केली. ती सरकारने मान्य केली असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. 

दरम्यान, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायच्या नाहीत. जर शासकीय भरती करायच्या असल्या तर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेऊन करायच्या अशी मागणी आपण केली. त्यावर राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देऊ असं सरकारने सांगितले पण मुलांचे काय?. सरकारने आजच्या रात्री हा अध्यादेश द्यावा. आम्ही वाटलं तर आजची रात्र इथेच काढतो. आज आझाद मैदानाकडे जात नाही. परंतु मुंबई सोडत नाही. अध्यादेशावर अभ्यास करतो. त्यात काही चुकीचे आहे का यावर रात्रभर अभ्यास करतो. जर आज अध्यादेश नाही दिला तर उद्या मी आझाद मैदानावर जाणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण