शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाटल्यास आजची रात्र वाशीत मुक्काम करतो, पण...; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 16:30 IST

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

नवी मुंबई - सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आजच काढा. ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्यात तर प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढेपर्यंत हवंतर इथेच थांबतो. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश सकाळी ११ पर्यंत काढा. तोपर्यंत आम्ही वाशीतच थांबू. आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय उद्या १२ वाजता घेऊ अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सामान्य विभागाचे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्याकडे आले होते. सरकारचे मंत्री चर्चेला आले नाहीत पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर त्या प्रमाणपत्राचे तुम्ही वाटप करा. नोंदी कुणाच्या सापडल्या त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात यादी चिटकवा. ज्याला नोंद मिळाली हे माहिती नसेल मग तो अर्ज कसा करणार? त्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केलेत. नोंदीही ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात केली. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या कुटुंबाला याआधारे प्रमाणपत्रे देण्यात यावे. एका नोंदीवर ५० ते १५० जणांना फायदा होतोय. यामुळे २ कोटी मराठा आरक्षणात जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ३७ लाख लोकांना आम्ही प्रमाणपत्रे वाटप केलेत असं सरकारने सांगितले आहे. ज्या लोकांच्या नोंदी झाल्यात त्यांचा डेटा आम्ही मागितला आहे. शिंदे समिती रद्द करू नये. या समितीची मुदत वर्षभर वाढवा अशी मागणी आपण केली. त्यावर टप्प्याटप्प्याने वाढवू असं सरकारने सांगितले. ज्याची नोंद मिळाली त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावेत. त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. आपल्यासाठी अध्यादेश महत्त्वाचा आहे. ५४ लाख बांधवांच्या कुटुंबात आणि सगेसोयरे यांना प्रमाणपत्र द्यायचे असेल तर ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांनी शपथपत्रे द्यायची. त्या शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्रे दिली जाईल. शपथपत्र मोफत करावे अशी मागणी आम्ही सरकारला केली. ती सरकारने मान्य केली असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. 

दरम्यान, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायच्या नाहीत. जर शासकीय भरती करायच्या असल्या तर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेऊन करायच्या अशी मागणी आपण केली. त्यावर राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देऊ असं सरकारने सांगितले पण मुलांचे काय?. सरकारने आजच्या रात्री हा अध्यादेश द्यावा. आम्ही वाटलं तर आजची रात्र इथेच काढतो. आज आझाद मैदानाकडे जात नाही. परंतु मुंबई सोडत नाही. अध्यादेशावर अभ्यास करतो. त्यात काही चुकीचे आहे का यावर रात्रभर अभ्यास करतो. जर आज अध्यादेश नाही दिला तर उद्या मी आझाद मैदानावर जाणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण