शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

टीकेपासून टाळ्यांचे धनी ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संयत भूमिकेचे होतेय कौतुक

By नारायण जाधव | Updated: January 28, 2024 12:55 IST

सरकारचा वाढणारा तणाव अन् आनंदाचा जल्लोष

नारायण जाधव, नवी मुंबई: लाखोंच्या संख्येने राजधानी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे मराठा बांधव. त्यांना वाटेतील प्रत्येक शहरात मिळणार अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ या कानठळ्या बसविणाऱ्या घोषणांनी सरकारचे मोठे टेन्शन वाढविले हाेते. अनेकदा मध्यस्थी करूनही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला न जुमानता आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची भूमिका घेतली. जरांगेंची पदयात्रा लोणावळा येथे मुंबईच्या वेशीवर आली असता त्यांना तेथे किंवा खारघर येथे थांबवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाकारण्याचा प्रयोग करून पाहिला; परंतु आंदोलकांनी त्यास भीक घातली नाही. यामुळे सरकारचे कमालीचे टेन्शन वाढले होते.

आंदोलकांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच बाजारपेठांच्या ७० हेक्टर क्षेत्रात ठाण मांडलेे. त्यासाठी पाचही बाजारपेठा दोन दिवस बंद ठेवल्या; परंतु आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने जास्त दिवस या बाजारपेठा बंद ठेवणे परवडणारे नव्हते. कारण तसे करणे म्हणजे आर्थिक राजधानीचे दाणापाणी बंंद करण्यासारखे होते. यामुळेच येथूनच सरकारची खरी सत्त्वपरीक्षा सुरू झाली. त्यातच सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जनभावना लक्षात घेऊन पिक्चरमध्ये कुठेच दिसले नाहीत. सारे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच विसंबून होते. ते स्वत: मराठा असल्याने समाजाच्या तीव्र भावना त्यांना ठाऊक होत्या. अनेक आंदोलक त्यांच्या परिचयाचे होते. त्याचा मोठा फायदा संवाद साधण्यात मुख्यमंत्र्यांना झाला. हेच हेरून त्यांनी एकीकडे आपल्या ओळखीच्या माध्यमातून बोलणी सुरू ठेवली, तर दुसरीकडे आरक्षणासाठी नक्की काय करता येईल, याचा अभ्यास सुरू ठेवला. दुसरीकडे पोलिस आणि गुप्तचरांच्या माध्यमातून आंदोलनाची नेमका परिपाक काय असेल, याची खातरजमा केली.

यात सर्वांत पहिल्यांदा जरांगेंच्या भूमीतील औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांना चर्चेस पाठविले. त्यात यश आले नाही. नंतर पुन्हा आतापर्यंत मराठा समाजाच्या भल्यासाठी कोणकाेणते निर्णय घेतले, ते घेऊन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे व मंगेश चिवटे यांना पाठविले. तरीही आंदोलक बधले नाहीत. त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत बाजार समितीतच ठाण मांडण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी कोणताही निर्णय न झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार विभागास सांगून मुंबईकरांना फळे, भाजीपाला यांची टंचाई जाणवू नये, यासाठी २६ जानेवारीला सुटी असूनही विशेष निर्णय घेण्यास भाग पाडले. यानुसार पश्चिम महाराष्ट्रातून येणारा भाजीपाला अटल सेतू व नाशिककडून येणारा भाजीपाला कसारामार्गे आणण्यासाठी मुंबई महापालिका आणि पोलिस आयुक्तांवर जबाबदारी सोपविली. यामुळे शनिवारी मुंबईत सुरळीत भाजीपाला गेला.

हे सर्व सुरू असताना तिकडे मुख्यमंत्र्यांचे डावपेच सुरूच होते. त्यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून त्यांच्या मागण्यांविषयी सुधारित अधिसूचना काढली. तीवर मध्यरात्री उशिरापर्यंत दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांनी चर्चा केली. ती मान्य करण्यात आल्या. त्यानंतर जरांगे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मागण्या मान्य झाल्याचे समाजबांधवांना सांगितले.

एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्री स्वत: येऊन आपल्याला अधिसूचना देणार असल्याचे जरांगेंच्या तोंडून वदवून घेतले. यामुळे टीकेचे धनी ठरलेले मुख्यमंत्री शनिवारी सकाळी प्रत्यक्ष सभेला मार्गदर्शन करताना टाळ्यांचे धनी ठरले. यावेळी समाजबांधवांना खुश करताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलनात आतापर्यंत बळी गेलेल्या ८० जणांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख याप्रमाणे ८० लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन मराठा तरुणांची वाहवा घेतली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे