शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 07:39 IST

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे.

नवी मुंबई : मराठा आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत. एपीएमसी मार्केटसह मैदानांचा आधार घेतला जाणार आहे. त्यासाठी फिरत्या शौचालयासह पाणी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा केली असली तरी अद्याप त्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना पालिका प्रशासनाने  केलेली नाही. 

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे. २५ जानेवारीला दुपारी आंदोलक पनवेलमध्ये येणार आहेत. सायंकाळी सर्वांचा मुक्काम नवी मुंबईत होणार आहे. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या राहण्याची, जेवणाची व सर्व प्रकारची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाला पत्र दिले आहे. 

पालिकेची मैदाने, सिडको प्रदर्शन केंद्र व इतर ठिकाणीही सोय करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नियोजनासाठीची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. महानगरपालिकेकडून फिरते शौचालय, पाणी व इतर सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, अद्याप प्रशासनाकडून बैठक झालेली नाही. यामुळे  पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त हाेत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजाला सलामी देऊन आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत. 

स्थानिकांचा मदतीचा हातआंदोलकांना जेवण पुरविण्यासाठी शहरातील प्रत्येक विभागातील मराठा नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत. नवी मुंबई केमिस्ट असोसिएशननेही वैद्यकीय मदत देण्याची तयारी केली आहे. सर्वांनी त्यांचे योगदान देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

मुंबई बाजार समिती २५ला राहणार बंद मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईत मुक्कामाला येणार आहेत. बाजार समितीमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. येथील लिलावगृह, गोडावून व माेकळ्या जागा आंदोलकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने बाजार समितीची सर्व मार्केट एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी पाणी, प्रसाधनगृह, जेवण व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची तयारी सकल मराठा समाजाने सुरू केली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNavi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षण