शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या जनसुनावणीस मराठा समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:20 IST

मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला.

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. तब्बल ९० संघटनांनी त्यांची निवेदने दिली असून, समाजाला लवकर आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये मराठा संघटनांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, तज्ज्ञ सदस्य, सचिव व आयोगाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रायगड व नवी मुंबई परिसरासाठी जनसुनावणीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच कोकण भवन परिसरामध्ये मराठा समाजाच्या संघटना व नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी कोकणभवनसमोर उपस्थिती दर्शविली होती. पाच हजार कामगारांच्या सह्यांचे निवेदन यावेळी आयोगाला देण्यात आले. मराठा समाजामधील माथाडी कामगार व इतर कष्टकरी नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अनेकांवर बेकारीची वेळ आली आहे. शेतीमध्ये पुरेसे उत्पादन होत नाही. यामुळे समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आरक्षणाचा निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळावा अशी विनंतीही करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे रायगडमधील संघटक विनोद साबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी निवेदने सादर केली आहेत. मराठा स्वराज्य संस्था, खारघर मराठा समाज, मराठा अस्तित्व प्रतिष्ठान यांच्यासह तब्बल ९० संघटनांनी निवेदने सादर केली आहेत. जवळपास पाच हजार नागरिकांनी वैयक्तिक निवेदने सादर केली आहेत.कोकण भवन परिसर मराठामय झाला होता. सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणीसाठी येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरच टोकन नंबर देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयातून नागरिक सुनावणीसाठी येत होते. सर्वांनी लेखी निवेदने सादर केली आहेत. निवेदन सादर करण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी गैरसोय होऊ नये व गोंधळ होऊ नये यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी सर्वांना सहकार्य करत होते. स्वयंसेवकांमुळे कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. निवेदन सादर करण्यासाठी आलेल्यांमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील, पोपटराव देशमुख, शिवाजीराव बर्गे, मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीमधील विनोद साबळे, अंकुश कदम, मोहन पाडळे, अ‍ॅड. राहुल पवार, मयूर धुमाळ, अभिजित भोसले, सूरज बडदे, राहुल गावडे, नीलेश मोडवे, अनिल गायकवाड, जनार्दन मोरे उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत सुनावणी पार पडली.>मोर्चाची आठवणकोकण भवनमध्ये मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी होती. या वेळी ९० पेक्षा जास्त संघटना व ५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी निवेदने सादर केली आहेत. सुनावणीसाठी रायगड व नवी मुंबईमधून हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे आले होते. यामुळे सर्वांना २१ सप्टेंबरच्या मूक मोर्चाची आठवण झाली. रायगड व नवी मुंबईमधील ७ लाख नागरिकांनी शांतपणे कोकणभवनवर मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली होती.>कडक बंदोबस्तसुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारावर व इमारतीमध्येही पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते. परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना पोलीसही योग्य सहकार्य करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी योग्य नियोजन केल्यामुळे सुनावणी शिस्तबद्धपणे पार पडली.>मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आरक्षण मिळाल्यास माथाडी कामगार व इतर कष्टकरी मराठा नागरिकांना त्याचा लाभ होईल. आयोगासमोर समाजाच्या स्थितीविषयी व आरक्षण का मिळावे याविषयी भूमिका आम्ही मांडली आहे.- नरेंद्र पाटील, माथाडी नेतेआरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने यापूर्वी मोर्चे काढले आहेत. समाजाच्या भावना आयोगासमोर मांडल्या आहेत. आता लवकरात लवकर आरक्षण जाहीर करून समाजाला न्याय मिळावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.- विनोद साबळे,मराठा क्रांती मोर्चा