शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आरक्षणाच्या जनसुनावणीस मराठा समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:20 IST

मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला.

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. तब्बल ९० संघटनांनी त्यांची निवेदने दिली असून, समाजाला लवकर आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये मराठा संघटनांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, तज्ज्ञ सदस्य, सचिव व आयोगाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रायगड व नवी मुंबई परिसरासाठी जनसुनावणीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच कोकण भवन परिसरामध्ये मराठा समाजाच्या संघटना व नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी कोकणभवनसमोर उपस्थिती दर्शविली होती. पाच हजार कामगारांच्या सह्यांचे निवेदन यावेळी आयोगाला देण्यात आले. मराठा समाजामधील माथाडी कामगार व इतर कष्टकरी नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अनेकांवर बेकारीची वेळ आली आहे. शेतीमध्ये पुरेसे उत्पादन होत नाही. यामुळे समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आरक्षणाचा निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळावा अशी विनंतीही करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे रायगडमधील संघटक विनोद साबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी निवेदने सादर केली आहेत. मराठा स्वराज्य संस्था, खारघर मराठा समाज, मराठा अस्तित्व प्रतिष्ठान यांच्यासह तब्बल ९० संघटनांनी निवेदने सादर केली आहेत. जवळपास पाच हजार नागरिकांनी वैयक्तिक निवेदने सादर केली आहेत.कोकण भवन परिसर मराठामय झाला होता. सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणीसाठी येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरच टोकन नंबर देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयातून नागरिक सुनावणीसाठी येत होते. सर्वांनी लेखी निवेदने सादर केली आहेत. निवेदन सादर करण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी गैरसोय होऊ नये व गोंधळ होऊ नये यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी सर्वांना सहकार्य करत होते. स्वयंसेवकांमुळे कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. निवेदन सादर करण्यासाठी आलेल्यांमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील, पोपटराव देशमुख, शिवाजीराव बर्गे, मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीमधील विनोद साबळे, अंकुश कदम, मोहन पाडळे, अ‍ॅड. राहुल पवार, मयूर धुमाळ, अभिजित भोसले, सूरज बडदे, राहुल गावडे, नीलेश मोडवे, अनिल गायकवाड, जनार्दन मोरे उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत सुनावणी पार पडली.>मोर्चाची आठवणकोकण भवनमध्ये मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी होती. या वेळी ९० पेक्षा जास्त संघटना व ५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी निवेदने सादर केली आहेत. सुनावणीसाठी रायगड व नवी मुंबईमधून हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे आले होते. यामुळे सर्वांना २१ सप्टेंबरच्या मूक मोर्चाची आठवण झाली. रायगड व नवी मुंबईमधील ७ लाख नागरिकांनी शांतपणे कोकणभवनवर मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली होती.>कडक बंदोबस्तसुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारावर व इमारतीमध्येही पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते. परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना पोलीसही योग्य सहकार्य करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी योग्य नियोजन केल्यामुळे सुनावणी शिस्तबद्धपणे पार पडली.>मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आरक्षण मिळाल्यास माथाडी कामगार व इतर कष्टकरी मराठा नागरिकांना त्याचा लाभ होईल. आयोगासमोर समाजाच्या स्थितीविषयी व आरक्षण का मिळावे याविषयी भूमिका आम्ही मांडली आहे.- नरेंद्र पाटील, माथाडी नेतेआरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने यापूर्वी मोर्चे काढले आहेत. समाजाच्या भावना आयोगासमोर मांडल्या आहेत. आता लवकरात लवकर आरक्षण जाहीर करून समाजाला न्याय मिळावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.- विनोद साबळे,मराठा क्रांती मोर्चा