शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने राज्यातील मराठा समाज भारावला; मनोज जरांगे पाटील यांनी केले कौतुक 

By नामदेव मोरे | Updated: February 7, 2024 19:33 IST

आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या लाखो समाज बांधवांची नवी मुंबईकरांनी काळजी घेतली.

नवी मुंबई: आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या लाखो समाज बांधवांची नवी मुंबईकरांनी काळजी घेतली. एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. गैरसोय होऊ दिली नाही. नवी मुंबईकरांनी केलेल्या सेवेचे राज्यभर कौतुक होत असून तुमचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे कौतुगोद्गार मनोज जरांगे पाटील यांनी काढले आहेत. नवी मुंबईमधील आगरी कोळी भवनमध्ये आयोजीत कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आंदोलनासाठी सहकार्य करणारांचा सत्कार करण्यात आला. आरक्षणासाठी आलेल्या लाखो मराठा समाजाचा नवी मुंबईत तळ पडला होता. 

संपूर्ण नवी मुंबईकरांची सेवा केली. तीन दिवस एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. मुंबई बाजार समितीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पाणी, जेवण, नाष्टा , वैद्यकीय सुविधा पुरविल्या. नवी मुंबईकरांनी खूप सेवा केली. याचे कौतुक सर्व राज्यभर होत आहे. या सेवाभावाचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या आंदोलकांचा सरकारने धसका घेतला. सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या. आता काही विचारतात की आंदोलनातून काय भेटले. या आंदोलनाने राज्यातील संपूर्ण समाज एकवटला. राज्यात कुणबी नोंदीची संख्या ६२ लाखांवर पोहचली आहे. सगेसोयऱ्यांची मागणी मान्य झाली. नोकर भरतीसह अनेक मागण्या मान्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, सचीव पी एल खंडागळे, अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वैभव नाईक, तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट, केमीस्ट असोसिएशन यांच्यासह मराठा आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विनोद पोखरकर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. अमरदीप गरड यांनी सुत्रसंचालन केले. मनोज जरांगे पाटील यांना शशिकांत शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांची पगडी देवून सन्मानीत करण्यात आले.

गाफील न राहण्याचे आवाहनआरक्षणाचा लढा शेवटच्या टप्यावर आला आहे. येणाऱ्या अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले की जवळपास २ कोटी मराठा समाज ओबीसी आरक्षणात जाईल. आतापर्यंत साथ दिली आता गाफील राहू नका. मी जगेल तो समाजासाठी मरेल तो समाजासाठीच. गोर गरीब मराठा समाजाचा विश्वासघात करणार नाही. १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसत आहे. सर्वांनी सजग रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :nagpurनागपूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे