शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने राज्यातील मराठा समाज भारावला; मनोज जरांगे पाटील यांनी केले कौतुक 

By नामदेव मोरे | Updated: February 7, 2024 19:33 IST

आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या लाखो समाज बांधवांची नवी मुंबईकरांनी काळजी घेतली.

नवी मुंबई: आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या लाखो समाज बांधवांची नवी मुंबईकरांनी काळजी घेतली. एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. गैरसोय होऊ दिली नाही. नवी मुंबईकरांनी केलेल्या सेवेचे राज्यभर कौतुक होत असून तुमचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे कौतुगोद्गार मनोज जरांगे पाटील यांनी काढले आहेत. नवी मुंबईमधील आगरी कोळी भवनमध्ये आयोजीत कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आंदोलनासाठी सहकार्य करणारांचा सत्कार करण्यात आला. आरक्षणासाठी आलेल्या लाखो मराठा समाजाचा नवी मुंबईत तळ पडला होता. 

संपूर्ण नवी मुंबईकरांची सेवा केली. तीन दिवस एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. मुंबई बाजार समितीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पाणी, जेवण, नाष्टा , वैद्यकीय सुविधा पुरविल्या. नवी मुंबईकरांनी खूप सेवा केली. याचे कौतुक सर्व राज्यभर होत आहे. या सेवाभावाचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या आंदोलकांचा सरकारने धसका घेतला. सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या. आता काही विचारतात की आंदोलनातून काय भेटले. या आंदोलनाने राज्यातील संपूर्ण समाज एकवटला. राज्यात कुणबी नोंदीची संख्या ६२ लाखांवर पोहचली आहे. सगेसोयऱ्यांची मागणी मान्य झाली. नोकर भरतीसह अनेक मागण्या मान्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, सचीव पी एल खंडागळे, अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वैभव नाईक, तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट, केमीस्ट असोसिएशन यांच्यासह मराठा आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विनोद पोखरकर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. अमरदीप गरड यांनी सुत्रसंचालन केले. मनोज जरांगे पाटील यांना शशिकांत शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांची पगडी देवून सन्मानीत करण्यात आले.

गाफील न राहण्याचे आवाहनआरक्षणाचा लढा शेवटच्या टप्यावर आला आहे. येणाऱ्या अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले की जवळपास २ कोटी मराठा समाज ओबीसी आरक्षणात जाईल. आतापर्यंत साथ दिली आता गाफील राहू नका. मी जगेल तो समाजासाठी मरेल तो समाजासाठीच. गोर गरीब मराठा समाजाचा विश्वासघात करणार नाही. १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसत आहे. सर्वांनी सजग रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :nagpurनागपूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे