शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने राज्यातील मराठा समाज भारावला; मनोज जरांगे पाटील यांनी केले कौतुक 

By नामदेव मोरे | Updated: February 7, 2024 19:33 IST

आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या लाखो समाज बांधवांची नवी मुंबईकरांनी काळजी घेतली.

नवी मुंबई: आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या लाखो समाज बांधवांची नवी मुंबईकरांनी काळजी घेतली. एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. गैरसोय होऊ दिली नाही. नवी मुंबईकरांनी केलेल्या सेवेचे राज्यभर कौतुक होत असून तुमचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे कौतुगोद्गार मनोज जरांगे पाटील यांनी काढले आहेत. नवी मुंबईमधील आगरी कोळी भवनमध्ये आयोजीत कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आंदोलनासाठी सहकार्य करणारांचा सत्कार करण्यात आला. आरक्षणासाठी आलेल्या लाखो मराठा समाजाचा नवी मुंबईत तळ पडला होता. 

संपूर्ण नवी मुंबईकरांची सेवा केली. तीन दिवस एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. मुंबई बाजार समितीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पाणी, जेवण, नाष्टा , वैद्यकीय सुविधा पुरविल्या. नवी मुंबईकरांनी खूप सेवा केली. याचे कौतुक सर्व राज्यभर होत आहे. या सेवाभावाचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या आंदोलकांचा सरकारने धसका घेतला. सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या. आता काही विचारतात की आंदोलनातून काय भेटले. या आंदोलनाने राज्यातील संपूर्ण समाज एकवटला. राज्यात कुणबी नोंदीची संख्या ६२ लाखांवर पोहचली आहे. सगेसोयऱ्यांची मागणी मान्य झाली. नोकर भरतीसह अनेक मागण्या मान्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, सचीव पी एल खंडागळे, अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वैभव नाईक, तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट, केमीस्ट असोसिएशन यांच्यासह मराठा आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विनोद पोखरकर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. अमरदीप गरड यांनी सुत्रसंचालन केले. मनोज जरांगे पाटील यांना शशिकांत शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांची पगडी देवून सन्मानीत करण्यात आले.

गाफील न राहण्याचे आवाहनआरक्षणाचा लढा शेवटच्या टप्यावर आला आहे. येणाऱ्या अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले की जवळपास २ कोटी मराठा समाज ओबीसी आरक्षणात जाईल. आतापर्यंत साथ दिली आता गाफील राहू नका. मी जगेल तो समाजासाठी मरेल तो समाजासाठीच. गोर गरीब मराठा समाजाचा विश्वासघात करणार नाही. १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसत आहे. सर्वांनी सजग रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :nagpurनागपूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे