शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कारखानदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:58 IST

जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत

प्रशांत शेडगे,  पनवेलजलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत तीन-तीन दिवस पाणी येत नसल्याने उद्योगावर परिणाम होऊ लागला आहे. याबाबत पर्यायी व्यवस्था करावी, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. याबाबत त्वरित बैठक लावून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.एकूण ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली असून, या ठिकाणी आजमितीला ८२३ छोटे-मोठे कारखाने आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कारखाने आणि औद्योगिक उलाढाल होत असताना येथे काही प्रमाणात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा सूर उमटत होता. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे अस्मानी संकट ओढावले आहे. बारवी व शहाड या दोन पाणीपुरवठा केंद्रातून तळोजा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ३८ एमएलडी पाणी रोज दिले जाते. पाणीसाठा कमी असल्याने जलसंपदा विभागाने पाणीबचतीचे निर्देश एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने सगळ्या कारखानदारांना ३0 टक्के पाणीकपात तीन महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस पाणीकपात करण्यात येते. जलशुध्दीकरण केंद्रातून आठवड्यातून ४८ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शनिवारी सुध्दा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीन दिवस एमआयडीसीतील कारखान्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुवार, शुक्र वार आणि शनिवारी एमआयडीसीचा घशा कोरडा पडत आहे. या ठिकाणच्या बहुतांशी कारखान्यांना पाण्याची आवश्यकता असून तेच मिळत नसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे टीएमसीच्या सचिव जयश्री काटकर यांनी सांगितले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांना केली होती. त्यानुसार आ. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव जयश्री काटकर, श्याम कारकून, दिलीप परूळेकर, स्वाती वाबळे, परेश देशपांडे, श्रीपाद लेले, मनोहर बोरसे, एम.जी.गोखले, यशवंत ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही महिन्यापूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीटंचाईवर मात्रा म्हणून गळती कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र गळती अद्याप कमी झाली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूस देण्यात आले. ७५ तासांचा शटडाऊन घेतल्यामुळे कारखान्यादारांना मोठा फटका बसत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नेरूळ येथील सीईडीपी प्लँटमधून तळोजा एमआयडीसीला पाणी दिले तर पाणीटंचाई दूर होईल, हा उपायही मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सुचविण्यात आला. तळोजातील टंचाई तातडीने दूर करण्याकरिता संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यामुळे कारखानदारांना दिलासा मिळाला.