शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:58 IST

जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत

प्रशांत शेडगे,  पनवेलजलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत तीन-तीन दिवस पाणी येत नसल्याने उद्योगावर परिणाम होऊ लागला आहे. याबाबत पर्यायी व्यवस्था करावी, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. याबाबत त्वरित बैठक लावून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.एकूण ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली असून, या ठिकाणी आजमितीला ८२३ छोटे-मोठे कारखाने आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कारखाने आणि औद्योगिक उलाढाल होत असताना येथे काही प्रमाणात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा सूर उमटत होता. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे अस्मानी संकट ओढावले आहे. बारवी व शहाड या दोन पाणीपुरवठा केंद्रातून तळोजा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ३८ एमएलडी पाणी रोज दिले जाते. पाणीसाठा कमी असल्याने जलसंपदा विभागाने पाणीबचतीचे निर्देश एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने सगळ्या कारखानदारांना ३0 टक्के पाणीकपात तीन महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस पाणीकपात करण्यात येते. जलशुध्दीकरण केंद्रातून आठवड्यातून ४८ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शनिवारी सुध्दा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीन दिवस एमआयडीसीतील कारखान्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुवार, शुक्र वार आणि शनिवारी एमआयडीसीचा घशा कोरडा पडत आहे. या ठिकाणच्या बहुतांशी कारखान्यांना पाण्याची आवश्यकता असून तेच मिळत नसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे टीएमसीच्या सचिव जयश्री काटकर यांनी सांगितले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांना केली होती. त्यानुसार आ. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव जयश्री काटकर, श्याम कारकून, दिलीप परूळेकर, स्वाती वाबळे, परेश देशपांडे, श्रीपाद लेले, मनोहर बोरसे, एम.जी.गोखले, यशवंत ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही महिन्यापूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीटंचाईवर मात्रा म्हणून गळती कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र गळती अद्याप कमी झाली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूस देण्यात आले. ७५ तासांचा शटडाऊन घेतल्यामुळे कारखान्यादारांना मोठा फटका बसत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नेरूळ येथील सीईडीपी प्लँटमधून तळोजा एमआयडीसीला पाणी दिले तर पाणीटंचाई दूर होईल, हा उपायही मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सुचविण्यात आला. तळोजातील टंचाई तातडीने दूर करण्याकरिता संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यामुळे कारखानदारांना दिलासा मिळाला.