शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी

By नामदेव मोरे | Updated: January 26, 2024 13:27 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले.

नवी मुंबई : वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा साऊंड सिस्टीम पुरेशी नसल्यामुळे एक तास थांबविण्यात आली आहे. शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेली चर्चा व शासनाने दिलेली लिखीत पत्रावर दोन वाजता चर्चा करण्यात येणार आहे. आरक्षण घेतल्यानंतरच परत जायचे असल्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले. हे पत्र घेवून ते वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेच्या ठिकाणी आले. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते भाषण सुरू करत असताना नागरिकांना व्यवस्थित आवाज येत नव्हता. यामुळे सभा थांबविण्यात आली आहे. नवीन साऊंड सिस्टीम बसविल्यानंतर सभा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुपारी दोन वाजता नवीन साऊंड सिस्टीम बसविल्यानंतर सभा पुन्हा सुरू केली जाणार आहे. शासनाने लिशखीत स्वरूपात जे दिले ते सर्वांना वाचून दाखविले जाईल. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाचा नवीन अद्यादेश नक्की काय आहे याविषयी सर्वांना उत्सूकता लागून राहिली आहे.

बैठक संपल्यानंतर तिरंगा हातातमनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून बाहेर येताना हातामध्ये तिरंगा हातात घेतला होता. यामुळे सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या असण्याची शक्यता उपस्थितांमध्ये सुरू होती.

मनोज जरांगेंच्या हातात गदावाशी येथील सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी गदा फिरवून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता नवीन जीआर विषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

आंदोलकांना पाणी द्यावाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेसाठी सकाळपासून नागरिक थांबले आहेत. साडेबारा वाजता सुरू झालेली सभा साऊंड सिस्टीमअभावी थांबविण्यात आली. दरम्यान सर्व आंदोलकांना तत्काळ पाणी पुरवठा करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. तत्काळ टँकरद्वारे व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण सुरू करण्यात आले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNavi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षण