शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

पनेवलमध्ये आजपासून मल्हार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 2:30 AM

‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे

पनवेल : ‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणाºया महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतील सभागृहनेते परेश ठाकूर व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपाचे तालुकाध्यक्ष अरु ण भगत यांनी केले आहे.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १०व्या मल्हार महोत्सवाच्या नियोजनासंदर्भातील माहिती देण्यासाठी नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला भाजपाचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष व महोत्सवप्रमुख जयंत पगडे उपस्थित होते.विविध राज्यांतील संस्कृती, मनोरंजन, कलाविष्काराची पर्वणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवार, २० जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी उपमहापौर चारुशीला घरत व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी उपस्थित राहणार आहेत.मराठी अभिनेत्री ‘माझ्या नवºयाची बायको’फेम अनिता दातार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. रविवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. या वेळी ते केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान योजनेअंतर्गत ‘स्वच्छ, सुंदर सोसायटी’ स्पर्धेची घोषणा करणार आहेत. तर २४ जानेवारीला महोत्सवाचा समारोप होणार असून राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया गुणिजनांचा (व्यक्ती व संस्था) पनवेल गौरव व रायगड गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सुकाणू, स्वागत, सांस्कृतिक, साहित्य, निमंत्रण, बक्षीस वितरण अशा विविध समित्या कार्यरत असून, विविध संस्कृती, कला-आविष्कारांची पर्वणी असलेल्या या महोत्सवास नागरिकांनी अवश्य भेट देऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन या वेळी आयोजकांच्या वतीने करण्यातआले.