शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने कोरोना संकटाला दिलेले तोंड वाखाणण्याजोगे - तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:03 IST

Tatyarao Lahane : महाराष्ट्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक वाढत होता त्या वेळी राज्य शासनाने केलेल्या अंमलबजावणीमुळे दुष्परिणाम होणे कमी झाले.

नवी मुंबई : कोरोनाकाळात महाराष्ट्रात वाढलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि रुग्णांना दिलेले उपचार हे वाखाणण्याजोगे असल्याचे मत डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. नवी मुंबई भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव, माजी नागसेविका कविता जाधव आणि साईराज व्याख्यानमाला यांच्या सहकार्याने शनिवारी १९ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या व्यख्यानमालेत डॉ. लहाने यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या वेळी डॉ. लहाने यांनी कोरोना आजार व काळजी तसेच डोळ्यांची काळजी यावर मार्गदर्शन केले.  महाराष्ट्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक वाढत होता त्या वेळी राज्य शासनाने केलेल्या अंमलबजावणीमुळे दुष्परिणाम होणे कमी झाले. रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून राज्यात तीन तपासणी लॅब होत्या त्यांची संख्या वाढविण्यात आली असून सद्य:स्थितीमध्ये ४०९ लॅब आहेत तसेच रुग्णांना उपचारासाठी आधी २३ हजार खाटा होत्या आता तीन लाख ६० हजार खाटा असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. कोरोनाचा प्रसार नाकात आणि तोंडात झाला तर त्याचा शरीरावर जास्त परिणाम होत नाही, परंतु फुप्फुसात गेला तर श्वास घेण्यास अडथळे निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे लहाने यांनी सांगितले. मधुमेह, रक्तदाब यासारखे विविध आजार असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असल्याने असे आजार असलेल्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी अद्याप संकट टळलेले नाही. त्यामुळे मास्क वापरणे, स्वच्छता आवश्यक असून सोशल डिस्टन्सचे पालन आवश्यक आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

डोळ्यांची काळजी आवश्यकमोबाइल आणि काॅम्प्युटर यासारख्या साधनांचा वापर जास्त प्रमाणात होत असून डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कॉम्प्युटरवर काम करताना सतत बसून राहणे योग्य नाही. मोबाइलवर गेम खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. संध्याकाळी डोळ्यांना थंड पाण्याने धुणे आवश्यक आहे. यामुळे डोळा आणि डोके दुखत नाही. गरज नसताना डोळ्यांमध्ये कोणतीही औषधे टाकू नका, असा सल्ला लहाने यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस