शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : बेलापूर विधानसभा शिवसेना लढणार- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:51 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- शिवसेना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वाशीत दिले.

नवी मुंबई /अलिबाग : शिवसेना बेलापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वाशीत दिले. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे सोमवारी नवी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर वाशीत झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर बेलापूर मतदार संघात विजयी मेळाव्यासाठी आपण पुन्हा येणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने सेना बेलापूरमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत, तर अलीकडेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेतून विजय नाहटा यांनीही बेलापूरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. असे असले तरीही ही जागा भाजपच्याच वाट्याला जाईल असे अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे बेलापूरची जागा शिवसेना लढणार असल्याचे संकेत दिल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवसातला चौथा टप्पा नवी मुंबईत झाला. त्यानुसार बेलापूर येथे या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर बेलापूर, नेरुळ, सानपाडा येथून ऐरोली येथील जनतेशी आदित्य यांनी संपर्क साधला.दरम्यान, शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा तळ कोकणानंतर सोमवारी अलिबागमध्ये दाखल झाली. अलिबाग येथील माळी समाज सभागृहात आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मदत केली आणि ज्यांनी केली नाही अशा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. नव्या महाराष्ट्राचे, भगव्या महाराष्ट्राचे स्वप्न स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम उद्धव ठाकरे, मी आणि तमाम शिवसेना करत आहे. यासाठी जनतेचे आशीर्वाद गरजेचे आहेत. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.निवडणुका जिंकण्याची अथवा हरण्याची चिंता कधीच बाळगली नाही. सत्तेमध्ये असतानाही शिवसेनेने जनतेसाठी संघर्ष केला आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले मात्र विम्याचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा विमा कंपन्यांनी पळ काढला होता. शेतकºयांचे पैसे ओरबाडणाºया धडा शिकवण्याचा एल्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढला. सेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील १० लाख शेतकºयांना विम्याची रक्कम मिळाली. ही शिवसेनेची ताकद असल्याची आठवण त्यांनी करुन दिली.याप्रसंगी सचिन अहिर यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी मार्गदर्शन केले.>खड्ड्यांचा त्रास सर्वांनाचमुंबईतील खड्ड्यांबाबत सेलिब्रिटींनी आवाज उठविल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहे. सेलिब्रिटींनाच त्रास होतो असे नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकार याची दखल घेऊन लवकरच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेईल.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019