शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : बेलापूर विधानसभा शिवसेना लढणार- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:51 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- शिवसेना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वाशीत दिले.

नवी मुंबई /अलिबाग : शिवसेना बेलापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वाशीत दिले. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे सोमवारी नवी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर वाशीत झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर बेलापूर मतदार संघात विजयी मेळाव्यासाठी आपण पुन्हा येणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने सेना बेलापूरमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत, तर अलीकडेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेतून विजय नाहटा यांनीही बेलापूरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. असे असले तरीही ही जागा भाजपच्याच वाट्याला जाईल असे अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे बेलापूरची जागा शिवसेना लढणार असल्याचे संकेत दिल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवसातला चौथा टप्पा नवी मुंबईत झाला. त्यानुसार बेलापूर येथे या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर बेलापूर, नेरुळ, सानपाडा येथून ऐरोली येथील जनतेशी आदित्य यांनी संपर्क साधला.दरम्यान, शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा तळ कोकणानंतर सोमवारी अलिबागमध्ये दाखल झाली. अलिबाग येथील माळी समाज सभागृहात आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मदत केली आणि ज्यांनी केली नाही अशा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. नव्या महाराष्ट्राचे, भगव्या महाराष्ट्राचे स्वप्न स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम उद्धव ठाकरे, मी आणि तमाम शिवसेना करत आहे. यासाठी जनतेचे आशीर्वाद गरजेचे आहेत. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.निवडणुका जिंकण्याची अथवा हरण्याची चिंता कधीच बाळगली नाही. सत्तेमध्ये असतानाही शिवसेनेने जनतेसाठी संघर्ष केला आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले मात्र विम्याचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा विमा कंपन्यांनी पळ काढला होता. शेतकºयांचे पैसे ओरबाडणाºया धडा शिकवण्याचा एल्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढला. सेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील १० लाख शेतकºयांना विम्याची रक्कम मिळाली. ही शिवसेनेची ताकद असल्याची आठवण त्यांनी करुन दिली.याप्रसंगी सचिन अहिर यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी मार्गदर्शन केले.>खड्ड्यांचा त्रास सर्वांनाचमुंबईतील खड्ड्यांबाबत सेलिब्रिटींनी आवाज उठविल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहे. सेलिब्रिटींनाच त्रास होतो असे नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकार याची दखल घेऊन लवकरच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेईल.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019