शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

Maharashtra Election 2019 : नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:58 IST

मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही.

नवी मुंबई : ऐरोलीसहबेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.प्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.खर्च कोणी करायचाअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा? असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.समाजमाध्यमांवरही भांडणेनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे. नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावरनवी मुंबई : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेºया काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.प्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाºयांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.खर्च कोणी करायचाअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा? असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.समाजमाध्यमांवरही भांडणेनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे.पोहोचण्यासाठी सुलभ मार्गप्रचारासाठी खूप कमी दिवस राहिले आहेत. प्रत्यक्ष सर्व मतदारांना भेटणे शक्य नाही. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा प्रभावी उपयोग केला जात आहे. प्रत्यक्ष पत्रके वाटण्याऐवजी समाजमाध्यमातून ते लवकर व कमी खर्चात पाठविता येत असल्याने समाजमाध्यमांचा वापर जास्त केला जात असल्याची प्रतिक्रिया नेरुळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महादेव पवार यांनी दिली. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पत्रकेही वाटण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रचार साहित्य पोहोचले नाहीऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप अनेक उमेदवारांची पत्रके व जाहीरनामे तयार झालेले नाहीत. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासाठी झेंडे, टोपी व इतर प्रचार साहित्यही अद्याप बहुतांश विभागामध्ये पोहोचलेले नाही. निवडणूक विभागाचेही खर्चावर बारीक लक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष रॅलीपेक्षा समाजमाध्यमांना पसंती दिली जात असल्याचे काही कार्यकर्त्यांनी नावन सांगण्याच्या अटीवर सांगितले.

 

टॅग्स :airoli-acऐरोलीbelapur-acबेलापूर