शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Maharashtra Election 2019 : नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:58 IST

मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही.

नवी मुंबई : ऐरोलीसहबेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.प्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.खर्च कोणी करायचाअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा? असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.समाजमाध्यमांवरही भांडणेनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे. नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावरनवी मुंबई : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेºया काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.प्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाºयांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.खर्च कोणी करायचाअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा? असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.समाजमाध्यमांवरही भांडणेनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे.पोहोचण्यासाठी सुलभ मार्गप्रचारासाठी खूप कमी दिवस राहिले आहेत. प्रत्यक्ष सर्व मतदारांना भेटणे शक्य नाही. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा प्रभावी उपयोग केला जात आहे. प्रत्यक्ष पत्रके वाटण्याऐवजी समाजमाध्यमातून ते लवकर व कमी खर्चात पाठविता येत असल्याने समाजमाध्यमांचा वापर जास्त केला जात असल्याची प्रतिक्रिया नेरुळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महादेव पवार यांनी दिली. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पत्रकेही वाटण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रचार साहित्य पोहोचले नाहीऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप अनेक उमेदवारांची पत्रके व जाहीरनामे तयार झालेले नाहीत. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासाठी झेंडे, टोपी व इतर प्रचार साहित्यही अद्याप बहुतांश विभागामध्ये पोहोचलेले नाही. निवडणूक विभागाचेही खर्चावर बारीक लक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष रॅलीपेक्षा समाजमाध्यमांना पसंती दिली जात असल्याचे काही कार्यकर्त्यांनी नावन सांगण्याच्या अटीवर सांगितले.

 

टॅग्स :airoli-acऐरोलीbelapur-acबेलापूर