शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

Maharashtra Election 2019: प्रचारात युती, आघाडीकडून बेरीज- वजाबाकीच्याच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:14 AM

Maharashtra Election 2019: चुरशीची लढत : अंतिम टप्प्यातील प्रचार आला रंगात; सभा, बैठकांना वेग

पेण : पेण मतदारसंघात युती विरुद्ध आघाडी अशी चुरशीची लढत पाहावयास मिळणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथील झालेली प्रचारसभा भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्या समर्थकांसाठी प्रोत्साहित करणारी ठरली. भाजपमध्ये इनकमिंग वाढले. रवींद्र पाटील यांचे संपूर्ण कुटुंब मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचारात सहभागी होऊन जागोजागी चौक सभा, घरोघरी मतदारांशी गाठीभेटी घेत आहे.

एकूणच त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसरीकडे शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान आ. धैर्यशील पाटील यांचे शिलेदार मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सतर्क झाले असून आपल्या हक्काचा गडकोट कायमचा आपल्यापाशी राहावा यासाठी नियोजनपूर्वक काम करून परिश्रम घेताना दिसतात. तर धैर्यशील पाटील यांच्या पत्नीही प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. अंतिम टप्प्यातील प्रचाराला पेण मतदारसंघात वेग आला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सामना एकतर्फी वाटत होता. मात्र, तो तसा न राहता वातावरण बदलले आहे. आता स्टारप्रचारकांच्या सभा नसल्याने स्थानिक मुद्दे प्रचारात आले आहेत. युती आघाडीचे कार्यकर्तेच आता उर्वरित दोन दिवस आपआपल्या गावात, शहरात, वार्डात, वाडी, वस्त्यांवर जे कार्यकर्ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत झटून कामे करत आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या खात्यात भरभरून मतदान कसे होईल, यासाठी परिश्रम घेत आहेत. शहरी भागात मतदार आपली निवड ओळखून मत देतो तर गावाकडे प्रत्येक पक्षाचा पारंपरिक चाहता वर्ग असतो. ते सर्व सामान्य मतदार पक्षनिष्ठा ठेवून मतदान करतात.

युती व आघाडी उमेदवार एकमेकांना टक्कर देत असताना या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने पारंपरिक काँग्रेस पक्षाच्या हात या निशाणीवर किती मतदान होते, यावर या लढतींचे खरे चित्र अवलंबून आहे. त्याचबरोबरीने एकाच नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचा किती स्कोअर होतो, नोटा व इतर राजकीय पक्ष बसप व अपक्ष असे या रणांगणात उभे राहिलेले १२ उमेदवार आहेत. त्यांना किती स्कोअर मिळतो, या सर्व बाबी पाहता एकूण तीन लाख १९ हजार २३८ मतदानापैकी होणारी मतदानाची टक्केवारी, मतदारांचा प्रतिसाद या सर्व बाबींवर उमेदवार व त्यांचे समर्थक बेरीज व वजाबाकीचे गणित जुळवून मॅजिक फिगरची आकडेवारी निश्चित करण्यात मग्न झाले आहेत.

प्रत्येक दिवशी बदलत जाणारे राजकीय वातावरण निर्मिती उमेदवारांची धाकधूक वाढवित आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मतदार कोणत्याही राजकीय पक्षाचे नसतात, अशा तरंगत्या मतदारांच्या २० टक्के गटाला कोण जिंकला, कोण हरला, याचे देणे-घेणे नाही. अशा मतदारांना रिचार्ज करणे क्रमप्राप्त ठरते. अशाची संख्या आता जागोजागी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. त्यांची मते निर्णायक ठरू शकतात, यासाठी कार्यकर्ता सतर्क झाले आहेत. हे २० टक्के मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचाराला प्राधान्य

एकंदर ४८ तासांचा अवधी प्रचारदौरा पूर्ण करण्यासाठीची डेटलाइन आहे. तर पुढील ४८ तास मतदारांशी गुप्तगू करण्यासाठीचे आहेत. मतदानाची टक्केवारी वाढल्यास निकाल चमत्कारिक लागणारा ठरेल. मात्र, ज्या बाजूकडे कार्यकर्त्यांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे तेच जोरदार लढाई करून बाजी पणाला लावतात. या मतदारसंघात नाही लाट, नाही राष्ट्रवादाचा मुद्दा, आपली भाकरी आपणच कमावली पाहिजे, असा श्रमिक मतदार आहे. ताई, माई, अक्का, विचार करा पक्का या घोषणा ऐकण्याची सवय राहिली नाही. टीव्हीवरच्या बातम्यांमधून राज्यभरात काय चाललेय याची माहिती मतदारांना मिळते. त्यामुळे गाव बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचाराला मतदारसंघात प्राधान्य दिले आहे.

 

टॅग्स :pen-acपेणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019