शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

Maharashtra Election 2019: वर्चस्वासाठी चुरशीची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 23:47 IST

जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, करंजा मच्छीमार बंदर, येथील रासायनिक प्रकल्प, होऊ घातलेला शिवडी-न्हावा सी-लिंक आणि नवी मुंबई विमानतळ तसेच खालापूर, रसायनीमधील विविध प्रकल्पांमुळे उरण मतदारसंघात औद्योगिक पसारा वाढतच आहे.

उरण : जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, करंजा मच्छीमार बंदर, येथील रासायनिक प्रकल्प, होऊ घातलेला शिवडी-न्हावा सी-लिंक आणि नवी मुंबई विमानतळ तसेच खालापूर, रसायनीमधील विविध प्रकल्पांमुळे उरण मतदारसंघात औद्योगिक पसारा वाढतच आहे. भविष्यात औद्योगिक राजधानी म्हणून उदयास येणाऱ्या या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार लढाई सुरू आहे.

उरण मतदारसंघात यंदा सेना-भाजप महायुतीचे विद्यमान उमेदवार मनोहर भोईर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्यातच लढत होत आहे. मात्र, प्रचारादरम्यान क्षणाक्षणाला विजयाचे पारडे या तीनही प्रमुख उमेदवारांच्या अवतीभवती फिरत आहे.

परस्परांविरोधात दररोजच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. जातीपातीच्या राजकारणात प्रचाराची पातळी खालावत चालली आहे. याशिवाय परिसरातील समस्या, वाहतूककोंडी सोडविण्याचा दावा सर्वच पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. आता मतदार कुणाला कौल देतात, हे निवडणुकीनंतरच कळेल.

जमेच्या बाजूप्रशासकीय कामांचा गाढा अभ्यास. खर्डे वक्ते , २० वर्षे आमदार राहिलेल्या आणि सत्ता नसतानाही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्नाळा स्पोटर््सच्या माध्यमातून देशपातळीवरील खेळाडू घडविले आहेत. जेएनपीटी, सिडको, ओएनजीसी, महामुंबई सेझ, नोकर भरती आदी प्रकल्पग्रस्तांच्या विविध आंदोलने, मोर्चा, संघर्षात आघाडीवर राहिले आहेत. केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणाविरोधात लढे उभारून कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न केले आहेत.उरण विधानसभा मतदारसंघात सेना-भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार मनोहर भोईर हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाच वर्षांत मतदारसंघातील काही समस्या मार्गी लावल्या. नौदलाच्या आरक्षित सेफ्टीझोनचा प्रश्न सुटला नसला तरी केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविले आहे. भोईर यांनी बांधबंदिस्तीसाठी निधी उपलब्ध करून २५०० एकर जमीन नापीक होण्यापासून वाचविली. हुतात्मा स्मारकांच्या सुशोभीकरण, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला.नगरसेवक, नगराध्यक्ष, जेएनपीटी ट्रस्टी ते भाजपचे जिल्हाध्यक्ष असा राजकीय प्रवास केलेल्या बालदींना प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे. भाजपमध्ये असताना सात उड्डाणपूल, ६-८ लेन रस्ते, जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप, करंजा मच्छीमार बंदरासाठी १५० कोटींचा निधी, जेएनपीटीच्या माध्यमातून बांधण्यात आलेले शिवसमर्थ स्मारक, घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठा आदीबाबत पाठपुरावा केल्याचा दावा बालदींनी केला आहे.

उणे बाजू

शैक्षणिक क्षेत्रात फारसे काम नाही. शेकडो शेतकºयांची हजारो हेक्टर जमीन नापीक झाली, यावर तातडीची उपाययोजना करण्यात अपयशी. बेरोजगारी, जेएनपीटी, सिडको प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाहीत. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडवाटपाचा प्रश्न अधांतरीच आहे. उरण मतदारसंघात आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यात तसेच मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात अपयश. २०१४ च्या पराभवानंतर अनेक निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्ते दुरावले.मनोहर भोईर यांना विकासकामांऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस असल्याचे बोलले जाते. जेएनपीटी-बेलापूर दरम्यान दररोज होणाºया वाहतूककोंडीवर पाच वर्षांत अद्यापही तोडगा निघाला नाही. औद्योगिकीकरण झपाट्याने होत असतानाही बेरोजगारांची संख्या वाढतच आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उरणमध्ये सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडवाटपाचा प्रश्नही ३० वर्षांपासून अद्यापही प्रलंबित आहे.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झाले. महायुतीमधून सेनेला उरणची जागा मिळाली. त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. उरणच्या विकासासाठी पाच हजार कोटींचा निधी आणण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. मात्र, अपक्ष उमेदवार इतका निधी कसा आणि कुठून आणणार याचीच चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. पाच वर्षांत नागरिकांनी केलेल्या आंदोलनात सहभाग नाही.

टॅग्स :uran-acउरणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019