शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या दुर्लक्षामुळे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान : नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 21:02 IST

शेतकऱ्यांच्या झालेल्या  शेतीच्या  नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व  शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : सिडकोने  बांधलेल्या साकवामध्ये अडकत असलेल्या केरकचऱ्यामुळे शेतीतील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने भात शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  होत असून येथील शेतकरी व ग्रामस्थांमधून सिडको विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सिडकोने शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी करून साकवाखाली जमा झालेला गाळ, केर कचऱा  काढून  शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशीही  मागणी  चाणजे येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सिडकोकडे केली आहे.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी सेक्टर ५९ येथील जागेत सिडकोने  साकव  बांधला आहे. या साकवामध्ये कचऱ्याच्या गाळ  बसत असल्यामुळे साकवाच्या खालून  पाण्याच्या प्रवाहाचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही.त्यामुळे चाणजे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले असून येथील भात शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे आत्ताच पेरणी केलेले भाताचे बियाणे आणि काही ठिकाणी उगवलेली भाताची कोवळी रोपे कुजून जाण्याची शक्यता आहे. शिवाय येथील विहिरीमध्ये खारे पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार ग्रामस्थांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र सिडकोचे अधिकारी या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत आहेत.

अजूनही सिडकोचे अधिकारी या सांडपाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी येथे फिरकले नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या नुकसानाची पाहणी करावी आणि साकवाच्या खाली साचलेला व बसलेला केरकचऱ्याचा गाळ ताबडतोब काढून टाकून साकव खालून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग खुला करावा. त्याचबरोबर  शेतकऱ्यांच्या झालेल्या  शेतीच्या  नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व  शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNavi Mumbaiनवी मुंबई