शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

सिडकोच्या दुर्लक्षामुळे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान : नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 21:02 IST

शेतकऱ्यांच्या झालेल्या  शेतीच्या  नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व  शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : सिडकोने  बांधलेल्या साकवामध्ये अडकत असलेल्या केरकचऱ्यामुळे शेतीतील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने भात शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  होत असून येथील शेतकरी व ग्रामस्थांमधून सिडको विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सिडकोने शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी करून साकवाखाली जमा झालेला गाळ, केर कचऱा  काढून  शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशीही  मागणी  चाणजे येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सिडकोकडे केली आहे.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी सेक्टर ५९ येथील जागेत सिडकोने  साकव  बांधला आहे. या साकवामध्ये कचऱ्याच्या गाळ  बसत असल्यामुळे साकवाच्या खालून  पाण्याच्या प्रवाहाचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही.त्यामुळे चाणजे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले असून येथील भात शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे आत्ताच पेरणी केलेले भाताचे बियाणे आणि काही ठिकाणी उगवलेली भाताची कोवळी रोपे कुजून जाण्याची शक्यता आहे. शिवाय येथील विहिरीमध्ये खारे पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार ग्रामस्थांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र सिडकोचे अधिकारी या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत आहेत.

अजूनही सिडकोचे अधिकारी या सांडपाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी येथे फिरकले नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या नुकसानाची पाहणी करावी आणि साकवाच्या खाली साचलेला व बसलेला केरकचऱ्याचा गाळ ताबडतोब काढून टाकून साकव खालून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग खुला करावा. त्याचबरोबर  शेतकऱ्यांच्या झालेल्या  शेतीच्या  नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व  शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNavi Mumbaiनवी मुंबई