शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

खार जमीन संशोधन केंद्रात लाखोंचे नुकसान; पाच हेक्टरवरील भात रोपांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:01 IST

गोदामातील ८ टन खत भिजले; विविध प्रजातीचे २ टन मासेही गेले वाहून

- वैभव गायकरपनवेल : रायगड जिल्ह्यात पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राला रविवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमिनीवर संशोधन करणारे हे एकमेव संशोधन केंद्र आहे. अतिवृष्टीमुळे केंद्रातील भाताची रोपं, विविध प्रजातीची मत्सबीजे, विक्री योग्य मासे आदींसह कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा २० लाखांच्या घरात गेला आहे.गेल्या दोन दिवसांत पनवेल तालुक्यात साधारण ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण भागासह पनवेल शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गाढी नदी किनारी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.शहरातील बंदर रोडवर असलेल्या खार जमीन संशोधन केंद्रातही पाणी साचल्याने संशोधन केंद्राचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५ हेक्टर परिसरातील भाताची रोपे वाहून गेली, तसेच या ठिकाणी तयार करण्यात येणारे युरिया(डीएपी) हे गोदामात साठविलेले ८ टन खतदेखील पाण्यात भिजले आहे. त्यामुळे सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती येथील खार जमीन शास्त्रज्ञांनी दिली. या व्यतिरिक्त केंद्रातील महत्त्वाचे रेकॉर्ड असलेले कागदपत्रे भिजली आहेत.संशोधन केंद्रात मत्सबीजांवर प्रक्रिया करून विक्री केली जाते. खार जमीन संशोधन केंद्रातील सुमारे दहा लाखांची मत्सबीजे वाहून गेली आहेत, तसेच रोहा, कटला, थीलापिया, जिताडा या वेगवेगळ्या प्रजातीचे विक्रीयोग्य दोन टन मासेदेखील वाहून गेल्याची माहिती खार जमीन शास्त्रज्ञ डॉ एस. बी. धोडके यांनी दिली. पाणीउपसा करणारा पंपही पाण्याखाली गेल्याने केंद्रात साचलेले पाणी काढण्यात अडथळा निर्माण झाला होता.पनवेलमध्ये १९४३ मध्ये कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर, १९५९ मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण ‘खार जमीन संशोधन केंद्र’ असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या योजनेतून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. मात्र, पारगाव येथील जमीन विमानतळासाठी संपादित झाल्याने खार जमीन क्षेत्राची जागा कमी होत आहे. विशेष म्हणजे, २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळेदेखील केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या केंद्राचे लाखोंचे नुकसान झाले आहे.खार जमीन संशोधन केंद्रात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पनवेल तहसीलदारांना पत्र लिहिले आहे, तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठालादेखील या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला आहे.- डॉ. एस. बी. धोडके, खार जमीन शास्त्रज्ञ.केंद्राला पुराचा धोकागाढी नदीचे पाणी पनवेल खाडीत जाते, त्या किनाऱ्यालगत खार जमीन संशोधन केंद्र आहे. विमानतळाच्या भरावामुळे नैसर्गिक पाणी साठणारे ठिकाण संकुचित झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो. त्यामुळे भविष्यात संशोधन केंद्राला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.