शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

खार जमीन संशोधन केंद्रात लाखोंचे नुकसान; पाच हेक्टरवरील भात रोपांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:01 IST

गोदामातील ८ टन खत भिजले; विविध प्रजातीचे २ टन मासेही गेले वाहून

- वैभव गायकरपनवेल : रायगड जिल्ह्यात पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राला रविवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमिनीवर संशोधन करणारे हे एकमेव संशोधन केंद्र आहे. अतिवृष्टीमुळे केंद्रातील भाताची रोपं, विविध प्रजातीची मत्सबीजे, विक्री योग्य मासे आदींसह कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा २० लाखांच्या घरात गेला आहे.गेल्या दोन दिवसांत पनवेल तालुक्यात साधारण ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण भागासह पनवेल शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गाढी नदी किनारी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.शहरातील बंदर रोडवर असलेल्या खार जमीन संशोधन केंद्रातही पाणी साचल्याने संशोधन केंद्राचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५ हेक्टर परिसरातील भाताची रोपे वाहून गेली, तसेच या ठिकाणी तयार करण्यात येणारे युरिया(डीएपी) हे गोदामात साठविलेले ८ टन खतदेखील पाण्यात भिजले आहे. त्यामुळे सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती येथील खार जमीन शास्त्रज्ञांनी दिली. या व्यतिरिक्त केंद्रातील महत्त्वाचे रेकॉर्ड असलेले कागदपत्रे भिजली आहेत.संशोधन केंद्रात मत्सबीजांवर प्रक्रिया करून विक्री केली जाते. खार जमीन संशोधन केंद्रातील सुमारे दहा लाखांची मत्सबीजे वाहून गेली आहेत, तसेच रोहा, कटला, थीलापिया, जिताडा या वेगवेगळ्या प्रजातीचे विक्रीयोग्य दोन टन मासेदेखील वाहून गेल्याची माहिती खार जमीन शास्त्रज्ञ डॉ एस. बी. धोडके यांनी दिली. पाणीउपसा करणारा पंपही पाण्याखाली गेल्याने केंद्रात साचलेले पाणी काढण्यात अडथळा निर्माण झाला होता.पनवेलमध्ये १९४३ मध्ये कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर, १९५९ मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण ‘खार जमीन संशोधन केंद्र’ असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या योजनेतून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. मात्र, पारगाव येथील जमीन विमानतळासाठी संपादित झाल्याने खार जमीन क्षेत्राची जागा कमी होत आहे. विशेष म्हणजे, २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळेदेखील केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या केंद्राचे लाखोंचे नुकसान झाले आहे.खार जमीन संशोधन केंद्रात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पनवेल तहसीलदारांना पत्र लिहिले आहे, तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठालादेखील या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला आहे.- डॉ. एस. बी. धोडके, खार जमीन शास्त्रज्ञ.केंद्राला पुराचा धोकागाढी नदीचे पाणी पनवेल खाडीत जाते, त्या किनाऱ्यालगत खार जमीन संशोधन केंद्र आहे. विमानतळाच्या भरावामुळे नैसर्गिक पाणी साठणारे ठिकाण संकुचित झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो. त्यामुळे भविष्यात संशोधन केंद्राला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.