शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम लोकप्रतिनिधी ही काळाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:43 IST

देशात लोकसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले की संधीसाधू आयाराम गयाराम यांच्याबरोबरच कोणता पक्ष आणि कोणते चिन्ह याचा थांगपत्ता लागत नाही.

यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर (नवी मुंबई) 

देशात लोकसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले की संधीसाधू आयाराम गयाराम यांच्याबरोबरच कोणता पक्ष आणि कोणते चिन्ह याचा थांगपत्ता लागत नाही. मतदारांची अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे. ही लोकसभेची निवडणूक फारच महत्त्वाची आहे असे एकंदरीत राजकीय ढवळलेल्या वातावरणावरून वाटते. इलेक्टोरल बॉण्ड घोटाळा, पीएम केअर फंडांत कोट्यवधींची रक्कम, कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला म्हणून ईडी, सीबीआय, आयटी यांचे धाडसत्र पाहता एक गोष्ट लक्षात येते की, ही कोट्यवधींची रक्कम ही सर्वसामान्य जनतेच्या करातून भ्रष्टाचारी राजकारण्यांनी केलेली लूट आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च हा ९५ लाख एवढाच करण्याचे बंधन निवडणूक आयोगाने घालून दिले असले तरी उमेदवार त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च करतात, ही लपून राहिलेली गोष्ट नाही.

मतदारांना आमिषेही दाखवली जातात. पोलिसांच्या धाडीत ड्रग्ज तसेच बनावट दारूचा साठा, खोट्या नोटा जप्त करण्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. आपले मत अमूल्य असून, आपल्या मतांची किंमत हजार-पाचशे रुपये नसून, देशाची प्रगती घडवणारे आहे. भ्रष्ट नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हा सर्व भ्रष्टाचारी प्रकार वर्षोनुवर्षे देशातील जनता अनुभवत आहे. 

सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षही तितकाच सक्षम असणे ही लोकशाहीची गरज आहे. लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे षड्यंत्र मतदारांनी खपवून घेऊ नये. सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने आतापर्यंत देशावर, राज्यावर लाखो, कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. ते कर्ज आपल्याच सर्वसामान्य जनतेला विविध कररूपाने फेडायचे आहे. 

सुजाण मतदारांनी देशाचा विचार करता कोणत्याच हावरट आमिषाला बळी पडू नये. भ्रष्ट उमेदवारांना, नेत्यांना धडा शिकवण्याची ही चांगली संधी आहे. उमेदवाराकडे किती पैसा आहे हे पाहण्यापेक्षा तो किती लायक आहे, आपल्या मतदारसंघाचा किती विकास करू शकेल, अशा प्रामाणिक उमेदवारालाच निवडून देण्याची गरज आहे. उमेदवारांनी दिलेली लाच स्वीकारून क्षणाची मजा आपल्यासाठी आयुष्यभराची सजा ठरू शकते. मतदारांनी या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा. सक्षम, पारदर्शी लोकप्रतिनिधी ही काळाची गरज आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण