शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक खेळाडूंचा प्रवास ‘खडतर’

By admin | Updated: May 20, 2017 04:46 IST

शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब राजकारण्यांच्या हितासाठी सुटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.नवी मुंबई महापालिकेकडून एकीकडे खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत. याचा त्रास त्याठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसह तरुण खेळाडूंना होत आहे. खेळासाठी राखीव असलेल्या मैदानांवर केवळ लाल मातीचा थर असणे आवश्यक आहे. त्यानुसार खेळाची मैदाने बनवताना सुरवातीला पालिकेतर्फे त्याठिकाणी मातीचा भराव टाकण्यात देखील आलेला आहे. परंतु सुरवातीला मैदान तयार केल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे बहुतांश मैदाने असूनही ती खेळाडूंसाठी गैरसोयीची ठरत आहेत. अनेकदा खेळाची मैदाने राजकीय सभा अथवा विविध संस्थांच्या कार्यक्रमासाठी भाड्याने दिली जातात. अशावेळी आयोजकांकडून मैदानावरील मातीची धूळ उडण्याचे थांबवण्यासाठी त्याठिकाणी वाळूचा थर टाकला जातो. नवरात्री उत्सवाच्या दरम्यान हा प्रकार सर्वच खेळाच्या मैदानांवर पहायला मिळतो. परंतु कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतर जेव्हा मैदाने मोकळी होतात, तेव्हा मात्र ही मैदाने खेळण्यायोग्य राहिलेली नसतात. त्यामुळे खेळाची मैदाने कोणत्याच कार्यक्रमासाठी दिली जावू नयेत, अथवा दिल्यास आयोजकांना अटी व शर्ती लागू कराव्यात अशी अनेकांची मागणी देखील आहे. मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून खेळाच्या मैदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने अनेक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्यांच्या प्रभागातील खेळाच्या मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु सुरक्षा भिंतीची काळजी घेतली जात असतानाच, मैदानातील खडी, वाळूचे थर हटवून मातीचा थर कायम राखण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानासह कोपरखैरणेतील मैदाने पार्किंगसाठी वापरली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुलांच्या शारीरिक वाढीसाठी मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु नवी मुंबईतील मुलांना खेळाची मैदाने असूनही त्याचा उपभोग घेता येत नाहीये. मैदानात मातीऐवजी खडी, वाळूचे थर साचल्याने पडून जखमा होत असल्याने पर्यायी पालकांनाच मुलांच्या मैदानी खेळावर निर्बंध घालावे लागत आहेत.पालिकेकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत. शहरातल्या बहुतांश खेळाच्या मैदानावर खडी, वाळूचे थर साचले आहेत. मैदानात केवळ लाल मातीचाच थर असणे आवश्यक असतानाही तक्रार करून देखील पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्याठिकाणी खेळताना पडल्याने लहान मुलांना दुखापती होत आहेत.-अभयचंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते