शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

स्थानिक खेळाडूंचा प्रवास ‘खडतर’

By admin | Updated: May 20, 2017 04:46 IST

शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब राजकारण्यांच्या हितासाठी सुटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.नवी मुंबई महापालिकेकडून एकीकडे खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत. याचा त्रास त्याठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसह तरुण खेळाडूंना होत आहे. खेळासाठी राखीव असलेल्या मैदानांवर केवळ लाल मातीचा थर असणे आवश्यक आहे. त्यानुसार खेळाची मैदाने बनवताना सुरवातीला पालिकेतर्फे त्याठिकाणी मातीचा भराव टाकण्यात देखील आलेला आहे. परंतु सुरवातीला मैदान तयार केल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे बहुतांश मैदाने असूनही ती खेळाडूंसाठी गैरसोयीची ठरत आहेत. अनेकदा खेळाची मैदाने राजकीय सभा अथवा विविध संस्थांच्या कार्यक्रमासाठी भाड्याने दिली जातात. अशावेळी आयोजकांकडून मैदानावरील मातीची धूळ उडण्याचे थांबवण्यासाठी त्याठिकाणी वाळूचा थर टाकला जातो. नवरात्री उत्सवाच्या दरम्यान हा प्रकार सर्वच खेळाच्या मैदानांवर पहायला मिळतो. परंतु कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतर जेव्हा मैदाने मोकळी होतात, तेव्हा मात्र ही मैदाने खेळण्यायोग्य राहिलेली नसतात. त्यामुळे खेळाची मैदाने कोणत्याच कार्यक्रमासाठी दिली जावू नयेत, अथवा दिल्यास आयोजकांना अटी व शर्ती लागू कराव्यात अशी अनेकांची मागणी देखील आहे. मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून खेळाच्या मैदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने अनेक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्यांच्या प्रभागातील खेळाच्या मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु सुरक्षा भिंतीची काळजी घेतली जात असतानाच, मैदानातील खडी, वाळूचे थर हटवून मातीचा थर कायम राखण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानासह कोपरखैरणेतील मैदाने पार्किंगसाठी वापरली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुलांच्या शारीरिक वाढीसाठी मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु नवी मुंबईतील मुलांना खेळाची मैदाने असूनही त्याचा उपभोग घेता येत नाहीये. मैदानात मातीऐवजी खडी, वाळूचे थर साचल्याने पडून जखमा होत असल्याने पर्यायी पालकांनाच मुलांच्या मैदानी खेळावर निर्बंध घालावे लागत आहेत.पालिकेकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत. शहरातल्या बहुतांश खेळाच्या मैदानावर खडी, वाळूचे थर साचले आहेत. मैदानात केवळ लाल मातीचाच थर असणे आवश्यक असतानाही तक्रार करून देखील पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्याठिकाणी खेळताना पडल्याने लहान मुलांना दुखापती होत आहेत.-अभयचंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते