शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

स्थानिक खेळाडूंचा प्रवास ‘खडतर’

By admin | Updated: May 20, 2017 04:46 IST

शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब राजकारण्यांच्या हितासाठी सुटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.नवी मुंबई महापालिकेकडून एकीकडे खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत. याचा त्रास त्याठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसह तरुण खेळाडूंना होत आहे. खेळासाठी राखीव असलेल्या मैदानांवर केवळ लाल मातीचा थर असणे आवश्यक आहे. त्यानुसार खेळाची मैदाने बनवताना सुरवातीला पालिकेतर्फे त्याठिकाणी मातीचा भराव टाकण्यात देखील आलेला आहे. परंतु सुरवातीला मैदान तयार केल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे बहुतांश मैदाने असूनही ती खेळाडूंसाठी गैरसोयीची ठरत आहेत. अनेकदा खेळाची मैदाने राजकीय सभा अथवा विविध संस्थांच्या कार्यक्रमासाठी भाड्याने दिली जातात. अशावेळी आयोजकांकडून मैदानावरील मातीची धूळ उडण्याचे थांबवण्यासाठी त्याठिकाणी वाळूचा थर टाकला जातो. नवरात्री उत्सवाच्या दरम्यान हा प्रकार सर्वच खेळाच्या मैदानांवर पहायला मिळतो. परंतु कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतर जेव्हा मैदाने मोकळी होतात, तेव्हा मात्र ही मैदाने खेळण्यायोग्य राहिलेली नसतात. त्यामुळे खेळाची मैदाने कोणत्याच कार्यक्रमासाठी दिली जावू नयेत, अथवा दिल्यास आयोजकांना अटी व शर्ती लागू कराव्यात अशी अनेकांची मागणी देखील आहे. मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून खेळाच्या मैदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने अनेक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्यांच्या प्रभागातील खेळाच्या मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु सुरक्षा भिंतीची काळजी घेतली जात असतानाच, मैदानातील खडी, वाळूचे थर हटवून मातीचा थर कायम राखण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानासह कोपरखैरणेतील मैदाने पार्किंगसाठी वापरली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुलांच्या शारीरिक वाढीसाठी मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु नवी मुंबईतील मुलांना खेळाची मैदाने असूनही त्याचा उपभोग घेता येत नाहीये. मैदानात मातीऐवजी खडी, वाळूचे थर साचल्याने पडून जखमा होत असल्याने पर्यायी पालकांनाच मुलांच्या मैदानी खेळावर निर्बंध घालावे लागत आहेत.पालिकेकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत. शहरातल्या बहुतांश खेळाच्या मैदानावर खडी, वाळूचे थर साचले आहेत. मैदानात केवळ लाल मातीचाच थर असणे आवश्यक असतानाही तक्रार करून देखील पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्याठिकाणी खेळताना पडल्याने लहान मुलांना दुखापती होत आहेत.-अभयचंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते