शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

साहित्य संमेलन सर्वसमावेशक

By admin | Updated: November 18, 2016 03:10 IST

शहरात होणारे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्यातील वेगळ्या विचारांना सामावून घेणारे,

डोंबिवली : शहरात होणारे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्यातील वेगळ्या विचारांना सामावून घेणारे, सर्वसमावेशक असेल. साहित्यातील सगळ्या प्रवाहांना स्पर्श करणारे संमेलन होईल. साहित्य संमेलन हे आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट संमेलन असेल, असा दावा साहित्य संमेलनाच्या आयोजक असलेल्या ‘आगरी युथ फोरम’ने केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निमंत्रक संस्थेसोबत एक बैठक १९ व २० तारखेला होत आहे. त्यासंदर्भात विषयाची चर्चा करण्यासाठी संमेलनाच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी एका बैठक झाली. या वेळी साहित्यिकांच्या सूचना व प्रस्ताव जाणून घेण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, मसापचे सुरेश देशपांडे, गणेश मंदिर संस्थानचे प्रवीण दुधे आदी उपस्थित होते. संमेलन नियोजनासाठी तयार केलेल्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. या डायरीच्या प्रती कार्यकर्त्यांना दिल्या जातील, असे वझे म्हणाले.देशपांडे यांनी सांगितले की, साहित्य संमेलनाची तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करूनच संमेलनाची तारीख ठरेल. साहित्य संमेलनाची दिंडी गणेश मंदिर संस्थानपासून काढण्यात येईल. या सगळ्या सूचनांचा विचार करून कार्यक्रमाची आखणी केली जाईल, असे वझे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)