शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

परवाना विभागामुळे कोटींचे नुकसान

By admin | Updated: November 23, 2015 01:12 IST

बाजार समितीमधील ३७०० व्यापाऱ्यांनी अद्याप साठा परवाना घेतलेलाच नाही. सलून, स्वीट मार्टसह हजारो व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत

नामदेव मोरे,  नवी मुंबईबाजार समितीमधील ३७०० व्यापाऱ्यांनी अद्याप साठा परवाना घेतलेलाच नाही. सलून, स्वीट मार्टसह हजारो व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. परवाना विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका पालिकेला बसत असून, कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आर्थिक संकटात सापडली आहे. महत्त्वाचा आर्थिक स्रोत बंद पडल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर होवू लागला आहे. पैशांची निकड भासू लागल्यामुळे मनपा प्रशासनाने कोणत्या मार्गाने महसूल वाढेल याविषयी चाचपणी सुरू केली आहे. शहरात होर्डिंग लावण्यापासून, आकाशचिन्ह, हॉटेल व इतर व्यावसायिकांनी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक असते. परवाना विभागाकडून वर्षाला २०० कोटींपेक्षा जास्त महसूल प्राप्त होवू शकतो. परंतु प्रशासनाने कधीही गांभीर्याने या विभागाकडे पाहिले नाही. २०१३ - १४ ला ७५ लाख रूपये परवाना शुल्क प्राप्त झाले होते. परंतु २०१४ - १५ ला उत्पन्न वाढण्याऐवजी ६४ लाख रूपये झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये ३७०० व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांनी साठा परवाना घेणे बंधनकारक आहे. परंतु बाजार समिती सुरू झाल्यापासून अद्याप एकाही व्यापाऱ्याने हा परवाना घेतला नाही. यामुळे वर्षाला पालिकेचे जवळपास ३ कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांवर एवढी मेहरबानी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरातील कोणत्या व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे याची यादी तयार केली आहे. कोणाला किती शुल्क आकारावे याविषयीही स्पष्ट तरतूद आहे. जवळपास ७० व्यवसायांसाठी पालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु या नियमांची योग्य अंमलबजावणीच होत नाही. शहरात हॉटेल, फॅब्रिकेशन व इतर काही व्यावसायिक पालिकेचा परवाना घेतात. परंतु सलून, अनेक स्वीट मार्ट, ब्युटी पार्लर, मटण विक्रेते, आईस्क्रीम, फटाका दुकाने विनापरवाना सुरू आहेत. यामुळे पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. शहरात होर्डिंग, भित्तीपत्रक लावण्यासाठीही पालिकेची परवानगी आवश्यक असते. परंतु परवाना विभाग व विभाग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विनापरवाना होर्डिंगबाजी सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही फुकट्या जाहिरातबाजांवर कारवाई होत नाही. महापालिका प्रशासन परवाना नसणारांना नोटीस पाठविते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. परवाना विभागाचा कारभार अमरीष पटनिगिरे यांच्याकडे असताना त्यांनी एपीएमसीच्या व्यापाऱ्यांना साठा परवाना घेण्यासाठीच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्यांच्या नंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावाच केलेला नाही. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, महापौर सुधाकर सोनावणे यांनी लक्ष देवून परवाना विभागाचा महसूल वाढविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होवू लागली आहे.