शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

इच्छुक उमेदवार पक्ष कार्यालय उघडण्यात मग्न

By admin | Updated: March 23, 2017 01:45 IST

आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सारेच पक्ष आपापली कार्यालये उघडण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण

मयूर तांबडे /पनवेलआगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सारेच पक्ष आपापली कार्यालये उघडण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षही आता पुढे सरसावले असून, पक्षाची कार्यालये इच्छुकांच्या गर्दीने फुल्ल होत आहेत. आपापल्या प्रभागात नवीन पक्ष कार्यालये उघडण्यात सारेच पक्ष आघाडीवर आहेत. पक्ष कार्यालय कार्यान्वित करण्यासंबंधी अनेकांनी कार्यवाही सुरू केली आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे पक्षांच्या कार्यालयांचे शटर पुढील पाच वर्षांकरिता बंद केली जातात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कायमस्वरूपी कार्यालये उघडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पनवेल महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे २०१७ मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात पक्षाचे स्वतंत्र कार्यालय उघडण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे. पनवेलमध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच लगीनघाई सुरू झालेली दिसत आहे, तर काहींनी आपापल्या प्रभागात पक्ष कार्यालये काही महिन्यांपूर्वीच उघडली देखील आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे जर आपल्या पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर पक्षांतराला देखील अच्छे दिन येणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी मिळते व कोण नाराज होतात हे काही दिवसांतच पाहायला मिळणार आहे. कार्यालयामार्फतच जनतेचे प्रश्न सोडवले जातात असे राजकारण्यांचे म्हणणे आहे. परंतु निवडणुका जवळ आल्यावरच पक्ष कार्यालये उघडली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे यातील काही कार्यालये केवळ निवडणुकीकरिताच उघडली जाणार आहेत की कायमस्वरूपी असणार आहेत याबाबत अनभिज्ञता आहे. मतदारांच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी अनेकांनी आपल्या पक्षाची कार्यालये स्थापन केली आहेत. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांच्या याद्या, मतदार याद्यांचे अवलोकन याकरिता या कार्यालयाचा उमेदवारांना उपयोग होणार आहे, तर अनेक ठिकाणची कार्यालये जशी उघडत आहेत तशीच काही दिवसांनी ती बंद होतात. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकीच पक्ष कार्यालये निवडणुकीनंतर उघडी असतात. अनेकदा उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काही दिवसातच कार्यालयाला टाळे ठोकले जाते तर विजयी उमेदवार देखील काहीच दिवसात आपले कार्यालय बंद करतो. त्यामुळे ही पक्ष कार्यालये निवडणुकीनंतर उघडी राहतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.