शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नवी मुंबईतील विविध नोडमध्ये ६६९ सौर दिव्यांची झळाळी; रस्ते, गावठाणात पडला प्रकाश

By नारायण जाधव | Updated: June 24, 2024 15:35 IST

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या स्मार्ट सिटी व्हिलेज अंतर्गत नवी मुंबईतील दिवाळे गावात सर्वप्रथम सोलर स्ट्रीट लाईट अर्थात सौर दिव्यांनी सुरुवात झाली.

नवी मुंबई - केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या धोरणाचा सर्वाधिक लाभ नवी मुंबई शहराने घेतला आहे. शहरातील ठिकठिकाणचे रस्ते, गावठाणांत आता सौर दिव्यांचा प्रकाश पडू लागला आहे. यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी खास पुढाकार घेतला असून, त्यांनी दिलेल्या आमदार निधीतून शहरातील सर्वच नोडमध्ये आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक सौर दिवे बसविण्यात आले आहेत. आतापर्यंत यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करून आणला असून त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे सहकार्य लाभले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

यात शहरातील जुनी गावठाणांसह महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि पायवाटांचा समावेश आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या स्मार्ट सिटी व्हिलेज अंतर्गत नवी मुंबईतील दिवाळे गावात सर्वप्रथम सोलर स्ट्रीट लाईट अर्थात सौर दिव्यांनी सुरुवात झाली. यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सर्वप्रथम १० कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. नंतर टप्प्याटप्प्याने शहरातील बेलापूर, सीवूड, नेरूळ, सानपाडा, वाशी या सर्व विभागांत ६६९ सौर दिवे आतापर्यंत बसविले असून यावर २५ कोटी खर्च झाल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

याठिकाणी बसविले हायमास्टआतापर्यंत शहरातील महत्वाचे चौकांसह बेलापूर विभागात ३४ तसेच नेरूळचे वंडर्स पार्क, ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, आर. आर. पाटील उद्यानासह वाशी विभागात ३४ असे ६८ सौर हायमास्ट बसविले आहेत. आणखी टप्प्याटप्प्याने बसविण्यात येत आहेत. शहराच्या गरजेनुसार सौर दिवे आणि हायमास्टसाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणण्यात येणार असल्याचे म्हात्रे म्हणाल्या.

दुर्गम भागासह गावठाणे, झोपडपट्टींसह बाजारपेठांमध्ये सोलारदिवे बसविल्याने चोरीच्या घटनांना आळा बसला आहे. विशेषत: सोनसाखळी चोरी, महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे कमी झाले असल्याचा दावा मंदाताई म्हात्रे यांनी केला.